शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

तुलसीदास जयंती विशेष : रामबोला ते गोस्वामी तुलसीदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:26 PM

चुडामण बोरसेजळगाव - ‘रामचरितमानस’ची आठवण आली तरी आपोआप गोस्वामी तुलसीदास यांची आठवण येते. बहुप्रतिभेचे धनी असलेल्या तुलसीदासांनी अनेक रचना केल्या आणि त्या अजरामर झाल्या. साक्षात प्रभू रामचंद्राने त्यांना दर्शन दिले आणि विशेष म्हणजे ही भेट प्रत्यक्ष हनुमानाने चित्रकूट येथील मंदाकिनी नदीच्या किनारी घडवून आणली... स्वत: श्रीरामाने तुलसीदासांना तिलक लावला... त्यामुळेचित्रकूट ...

चुडामण बोरसेजळगाव - ‘रामचरितमानस’ची आठवण आली तरी आपोआप गोस्वामी तुलसीदास यांची आठवण येते. बहुप्रतिभेचे धनी असलेल्या तुलसीदासांनी अनेक रचना केल्या आणि त्या अजरामर झाल्या. साक्षात प्रभू रामचंद्राने त्यांना दर्शन दिले आणि विशेष म्हणजे ही भेट प्रत्यक्ष हनुमानाने चित्रकूट येथील मंदाकिनी नदीच्या किनारी घडवून आणली... स्वत: श्रीरामाने तुलसीदासांना तिलक लावला... त्यामुळेचित्रकूट के घाटपर भई संतन की भीरतुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर... हा दोहा प्रचलित झाला तो या भेटीमुळेच...प्रयागनजीक चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर येथे तुलसीदासांचा जन्म श्रावण शुद्ध सप्तमीला झाला. बारा महिने आईच्या गर्भात राहिलेल्या या बालकाचा रडण्याचा आवाज न येता ‘राम’ हा शब्द निघाला... तोंडात चक्क ३२ दात आणि हालचाल पाच वर्षाच्या बालकासारखी होती. आईच्या अकाली मृत्यूनंतर दासी चुनिया हिने या बालकाचा सांभाळ केला.काही काळानंतर नरहरीनंद स्वामी नावाचे गृहस्थ शोध घेत तुुलसीदासांपर्यंत पोहचले. त्यांनी त्यांचे ‘रामबोला’ असे नामकरण करीत अयोध्येला नेले. न शिकविता हा बालक गायत्री मंत्राचा उच्चार करीत होता. त्यामुळे तेही चकीत झाले. पुढे ‘रामबोला’ काशी येथे गेले आणि वेदाचा अभ्यास करु लागले. तिथून ते जन्मभूमी राजापूरला आणि काशीला गेले. तिथे रामकथा सुरुच होती. तिथे त्यांनी साधूवेश धारण केला. या रामभक्ताला प्रत्यक्ष हनुमानाचे दर्शन झाले. पुढे हनुमानानेच चित्रकूटमध्ये तुम्हाला रामाचे दर्शन होईल, असे सांगितले. चित्रकूटला आल्यावर मौनी अमावस्येला तुलसीबाबांना रामाचे दर्शन झाले.यानंतर ते काशीला आले. तिथे प्रल्हाद घाटावर राहत असताना कवित्वशक्तीची जाणीव झाली आणि ते संस्कृतमध्ये पद्यरचना करु लागले. असे म्हणतात की भगवान शंकराच्या आज्ञेवरुन ते अयोध्येला गेले आणि हिंदी भाषेत रचना सुरु केली.रामनवमीच्या दिवशीच ‘रामचरितमानस’ लिहायला सुरुवात झाली. तब्बल दोन वर्षे, सात महिने आणि २६ दिवसांनी म्हणजे रामविवाहाच्या दिवशीच रामचरितमानस लिहून पूर्ण झाले आणि जगाला साहित्यातील सर्व रस असलेला हा अद्भूत ग्रंथ मिळाला.‘रामचरितमानस’ लिहून पूर्ण झाल्यावर रात्री तो विश्वनाथ मंदिरात ठेवण्यात आला. सकाळी त्यावर सत्यं, शिवमं, सुंदरम् अशी अक्षरे लिहलेली आढळून आली.. त्यामुळे या ग्रंथावर जणू मान्यतेची मोहोरच उमटली आणि त्यातल्या भाषा सौंदर्यांने हा ग्रंथ उजळून निघाला आणि त्यातले अनेक दोहे हे सहजपणे ओठावर येत असतात...

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराJalgaonजळगाव