शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने केला घात, कापूस शेतीची वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क महिंदळे, ता. भडगाव : परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कपाशी लागवड केली होती. मात्र कापूस वेचणीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

महिंदळे, ता. भडगाव : परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कपाशी लागवड केली होती. मात्र कापूस वेचणीवर आला असतानाच पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केल्याने या शेतीची पुरती वाताहत झाली आहे.

सुरुवातीला तुरळक पाऊस व आता अतिपाऊस असल्यामुळे वेचणीला आलेला कापूस बोंडातच अडकला आहे. झाडांवर पाला नसल्यामुळे शेतांनी जणू पांढरा शालू परिधान केला असल्याचे दिसते.

शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कपाशी, परंतु या पांढऱ्या सोन्याला अनेक रोगांनी ग्रासले व कपाशी पीक पूर्ण लाल पडले. झाडावरील सर्व पाला गळून पडला व आहे तो कापूस आता वेचणीवर आला असताना पाऊस मात्र तोही वेचू देत नाही. त्यामुळे सर्व कापूस शेतात भातासारखा दिसत आहेत.

खर्चाच्या तुलनेत उत्पन्न शून्य

शेती मशागतीपासून ते कापूस वेचणी पर्यंत शेतकऱ्यांना एकरी होणारा खर्च पाहता यावर्षी उत्पन्न शून्यावर येऊन ठेपले आहे.

एकरी खर्च

नांगरटी.... १५०० रुपये

रोटाव्हेटर.. १००० रुपये

बियाणे (दोन बॅग) १५०० रुपये

वखरटी... ५००० रुपये

रासायनिक खत १०,००० रुपये

फवारणी.... ५००० रुपये

कापूस वेचणी..७०० रुपये क्विंटल

एकूण खर्च २४७०० रुपये

कापूस येईल एकरी तीन क्विंटल पंधरा हजार रुपये

कापसाची सड आणि पड

पेरणीनंतर पावसाने सातत्याने ओढ दिल्याने विहिरींच्या तोकड्या पाण्यावर शेतकऱ्यांनी पिके जिवंत ठेवली. तुरळक पावसामुळे पिके जोमदार होती. उन्हाळी कपाशी लागवड केल्यामुळे झाडांवर माल लवकर तयार झाला. परंतु सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात अतिपावसामुळे व वातावरणातील आर्द्रता यामुळे कापूस पिकावर मर व लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने झाडांवरील पाला गळून पडला. त्यामुळे झाडावर फक्त बोंडेच शिल्लक राहिल्याने सततच्या पावसामुळे काही बोंडे काळी पडून सडली व काही फुटली, पण पावसामुळे तीही वेचणी करण्यासाठी पावसाचा व्यत्यय येत असल्यामुळे कापूस खाली पडण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे कवडी कापूस निघत आहे.

कापसाला कवडीमोल भाव

अतिपावसामुळे व वातावरणातील आर्द्रतेमुळे कापूस फुटण्यास अडचण येत आहे. थंड वातावरणामुळे व अतिपावसामुळे सड झाल्याने कवडी कापूस निघत आहे. त्यामुळे व्यापारी या कापसाला कवडीमोल भावाने घेत आहेत. पावसात वेचणी केलेला कापूस खराब होण्याच्या भीतीने शेतकरी मिळेल, त्या भावाने कापूस विकताना दिसत आहेत. व्यापारीही चार हजारपासून ते पाच हजार रुपये क्विंटल घेत आहेत. एकरी दहा क्विंटल येणारा कापूस यावर्षी दोन ते तीन क्विंटलवर थांबणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न शून्य येणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

शेतकरी लागला रब्बीच्या नियोजनात

कपाशी पिकावर वेळेआधी मर व लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने दोनच वेचणीत कपाशी उपटून फेकावी लागणार असल्यामुळे शेतकरी पुढील पिकाच्या पिकाच्या नियोजन करताना दिसत आहे. कापसाचे पीक हाताचे गेल्याने व विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे आता रब्बीच्या आशेवर शेतकरी आहे.

260921\26jal_9_26092021_12.jpg

महिंदळे परिसरातील कापसाचा शेतात झालेला भात.