शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा खंडित होणे ही झाली नित्याचीच बाब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

भुसावळ : पावसाचे चार शितोडे जरी आले किंवा हलकासा वारा सुटला की लगेचच वीजपुरवठा खंडित होतो. ही ...

भुसावळ : पावसाचे चार शितोडे जरी आले किंवा हलकासा वारा सुटला की लगेचच वीजपुरवठा खंडित होतो. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शिवाजीनगर भागातील संतप्त नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देत ही समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली आहे. रहिवाशांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पावडे यांना निवेदन दिले असून ही समस्या न सुटल्यास वीज बिल न भरण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनावर गौरव राजेंद्र वाघ, हर्षल कापडे, रेहान अली, समीर महोमद, रफिक शेख, चेतन मेहते, आकाश अग्रवाल, प्रवीण भोसले, आशिष जाधव, विशाल अग्रवाल, महोमद जुबेर, नदीम शेख, अशोक पवार, जितू मेहरा, नेहाल यादव, तुषार पवार, अभिषेक देवपूजे, नितीन वाघ, आकाश निकम, नितीन गोरे, वेभव बर्गे, वरुण अग्रवाल, चेतन मेंढारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

केवळ लॉकडाऊनमध्येच पुरवठा सुरळीत?

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अखंड वीजपुरवठा देणाऱ्या महावितरणला आता सुरळीत वीजपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ लॉकडाऊन असेल तरच महावितरण सुरळीत वीजपुरवठा करू शकते का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तांत्रिक कामाच्या नावाखाली खंडित होतो वीजपुरवठा

शाळा, कॉलेजेसकडून ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. अद्यापही अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. अशात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. उन्हाळा नसतानाही केवळ तांत्रिक कामाच्या नावाखाली देखभाल, दुरुस्तीअभावी महावितरण सुरळीत वीजपुरवठा करूच शकत नसल्याचे बोलले जात आहे.

दरात वाढ कायम, समस्या मात्र सुटेना

दरवर्षी महावितरणकडून वीजदरात वाढ करण्यात येते. त्या तुलनेत सुविधा मात्र देण्यात येत नाहीत. शहरातील ८५ टक्के भागांत वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावर खेळखंडोबा सुरू आहे. अनेक भागांमध्ये व्होल्टेजची समस्याही कायम आहे. त्यामुळे नागरिक हैराण आहेत.