शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लागवडीला वीज वितरणचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बिडगाव ता. चोपडा : परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांदा लागवडीला वीज वितरणच्या भारनियमनाचा खोडा ठरत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बिडगाव ता. चोपडा : परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांदा लागवडीला वीज वितरणच्या भारनियमनाचा खोडा ठरत आहे. आठवड्यातून फक्त तीनच दिवस दिवसा वीज मिळत आहे.म्हणून कांदा लागवड करावी तरी अशी?असे संकट परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठाकले आहे.

बिडगाव येथील सरपंच विजया देविदास पाटील यांनी परिसरात होणाऱ्या भारनियमनाच्या वेळेत बदल करून शेतकऱ्यांची कांदा लागवडीची समस्या सोडवावी, अशी मागणी लेखी स्वरूपात वीज वितरणकडे केली आहे.

बिडगावसह परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी महागडी हजारो रुपयांची कांद्याची बियाणे विकत घेऊन मोठ्या प्रमाणात कांदा रोपांच्या नर्सरी टाकून लागवडीचे नियोजन केले आहे. अनेक शेतकऱ्यांची रोपेही आता तयार झाली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवडही सुरू केली आहे. ही लागवड आता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.

कांद्याची लागवड ही वाहत्या पाण्यात केली जाते व पाण्यासाठी विजेची आवश्यकता असते. मात्र, वीजवितरणचे भारनियम या कांदा लागवडीला अडथळा ठरत असून, लागवडी रेंगाळत आहेत. बिडगांव व कुंड्यापाणी या शेतशिवारात वीजपुरवठा करणाऱ्या फिडरला गेल्या चार वर्षांपासून आठवड्यातून फक्त शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीनच दिवस सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दिवसा वीज पुरवठा केला जातो व चार दिवस रात्री वीज मिळते, ती दिवस उगविण्याआधीच बंद होत असते. त्यामुळे तीन दिवसांत लागवड करणे शक्य होत नाही. नर्सरीवर हजारो रुपये खर्च करून रोपे तयार करूनही विजेअभावी लागवड बंद पडते व पुन्हा लागवडसाठी दिवसाच्या वीजपुरवठ्याची चार दिवस प्रतिक्षा करावी लागते. तशात पाऊस आला तर रोपेही खराब होतात व मोठे आर्थिक नुकसान होते. परिणामी शेतकरी डबघाईस जातात आणि तीनच दिवस दिवसा विजेमुळे मजुरांचीही धांदल उडते व चार दिवस घरीच बसावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांचेही नुकसान होते. आधी रात्र व दिवस असे रोटेशन‌नुसार हे भारनियम बदलत होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून वीजवितरणकडून त्याच्यात बदलच केला नाही. मागील वर्षी लागवड कमी होती व रात्री येणारी वीज सकाळी नऊ वाजेपर्यंत मिळत होती. त्यामुळे अडचण भासली नव्हती. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड आहे व रात्री मिळणारी वीज सकाळी पाच वाजताच बंद होते.

भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याची मागणी

विजेअभावी कांदा उत्पादक शेतकरी लागवडीआधीच वीज वितरणच्या सुलतानी संकटात सापडले आहेत. तरी महावितरणने याची वेळीच दखल घेऊन भारनियमच्या वेळेत बदल करून आठवड्यातून दिवसा तिन दिवसच होणारा वीजपुरवठा चार दिवस करावा व रात्री मिळणारा वीजपुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत करावा अशी मागणी बिडगांव येथील महिला सरपंच विजया पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.

चोपडा तालुक्यात कांद्याची लागवड सुरू असताना. (छाया : रावसाहेब पाटील,बिडगाव)