शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी विसरले निवडणुकीतील आश्वासन पूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:54 IST

चार वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीच्या वेळेस देण्यात आलेली आश्वासन पूर्ती लोकप्रतिनिधी विसरले की काय, असा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे.

ठळक मुद्देजागतिक विसरभोळे दिन विशेषभुसावळ शहरवासीयांचे विविध प्रश्न सोडविण्याची जनतेला अपेक्षा

वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : चार वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीच्या वेळेस देण्यात आलेली आश्वासन पूर्ती लोकप्रतिनिधी विसरले की काय, असा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे. शहरातील रस्ते, पाणी, क्रीडा संकुल, उड्डाणपूल, प्लॅस्टिक पार्क, गटारी, दिवाबत्ती, कचरा निर्मूलन असे विषय साडेचार वर्षे उलटूनही सुटलेले नाहीत. ‘जागतिक अल्झायमर्स डे’ अर्थात ‘जागतिक विसरभोळे दिन’ २१ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्त निवडणुकीनंतर आश्वासनांच्या पूर्ततेवर नजर टाकली असता विविध बाबी प्रकर्षाने समोर येतात.
रेल्वे जंक्शन ओळख
शहरात प्रचंड नागरी समस्या आहेत. याचा भुसावळवासीयांना पदोपदी अनुभव येत आहे. यात अमृत योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची झालेली वाताहत असो, ७ दिवसाआड होणारा अशुद्ध पाणीपुरवठा, तुंबलेल्या गटारी किंवा स्वच्छतेचा प्रश्न सर्व बाबतीत आश्वासन पूर्ती झालेली नसल्याचे दिसून येते.
‘अमृत’मुळे रस्त्यांची लागली वाट
अमृत योजनेमुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. यामुळे वाहने चालवणे तर दूरच, पायी चालणेही कठीण झाले आहे. याशिवाय भरपावसाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध असतानासुद्धा जीर्ण, कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा यंत्रणेमुळे सातव्या दिवशी भुसावळकरांना पाणी मिळत आहे.
रेल्वे हद्दीतील अतिक्रमण उठले
रेल्वे प्रशासनाने सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी रेल्वे हद्दीतील एक जणू छोटे बसलेले शहरच उद्ध्वस्त केले. अतिक्रमण काढताना त्यावेळी याठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरी होणार असून, स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल, अशी आश्वासने नागरिकांना देण्यात आली होती. रोजगार तर मिळालाच नाही, घरे मात्र उद्ध्वस्त झाली.
क्रीडा संकुल वनवासात
क्रीडानगरी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात अनेक खेळाडू प्रतिभावंत, गुणवंत आहेत. रेल्वे मैदान किंवा खासगी संस्थेच्या मैदानावर सराव करून ते खेळांमध्ये नैपुण्य दाखवत असतात, मात्र हक्काचे क्रीडा संकुल नाहीच. क्रीडा संकुलाचाही विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गल्लोगल्ली ‘डॉन’
शहरात गल्लोगल्ली ‘डॉन’ निर्माण झाले आहेत. गावठी कट्टे, तलवारी बाळगणे व त्याचा वापर करणे हे भुसावळमध्ये जणू फॅशन झाले आहे. भरदिवसा २०-२१ वयोगटातील मुले खून करतात; यावरही अंकुश असणे महत्त्वाचे आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे उद्योग-व्यवसाय भुसावळपासून दूर जात आहेत.
अजेंड्याचा विसर
उद्यान विकास , शहराच्या दोन्ही भागांना जोडणारा भुयारी मार्ग, शहरात बंदिस्त नाट्यगृह, नगरपालिकेच्या दवाखान्याचे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये रूपांतर, शाळांना नवीन खोल्या आणि सर्वांगीण शैक्षणिक विकास हा अजेंडा देण्यात आला होता. मात्र यात यश मिळाल्याचे दिसत नाही की विसरभोळेपणा झाला हे समजत नाही.
तांत्रिक अडचणीशी काय घेणे?
शासकीय योजना, प्रकल्प करीत असताना यात तांत्रिक अडचणी येत असतात. किचकट कागदोपत्री प्रक्रिया करावी लागते हे सर्वश्रुत आहे, यानंतरच विकास कामांचे मार्ग मोकळे होतात. मात्र सामान्य नागरिकांना तांत्रिक अडचणीशी काही घेणेदेणे नसते. त्यांना फक्त हवी असते कृती... तीही विसरभोळेपणा ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ