शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हमी भावाची केवळ घोषणा, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST

जळगाव : शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा यासाठी सरकारकडून कृषी मालासाठी हमी भावाची घोषणा होत असली तरी प्रत्यक्षात ...

जळगाव : शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा यासाठी सरकारकडून कृषी मालासाठी हमी भावाची घोषणा होत असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी हे भाव पडतच नसल्याचे चित्र आहे. हमी भाव व शेतकऱ्यास प्रत्यक्षास मिळणारा भाव यात निम्म्याचा फरक असून हमी भावाची केवळ घोषणा होते, त्याची अंमलबजावणीदेखील व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कृषी विधेयकाला विरोध व विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून मंगळवारी विविध संघटनांच्यावतीने भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खरच हमी भावाचा लाभ होत आहे का, या विषयी माहिती घेतली असता शेतकरी या हमी भावापासून कोसो दूर असल्याचे सांगण्यात आले.

अटींच्या भोवऱ्यात अडकला कृषी माल

शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा म्हणून सरकारने यंदा हमी भावात वाढ केली. ही वाढ पाहता ती किरकोळ असल्याचेच चित्र असून वाढ तर सोडा पूर्वीचा हमी भावदेखील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मुळात शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी केली तरी त्याला दर्जाची अट घालून केवळ एफएक्यू दर्जाचा माल हमी भावाने घेतला जाईल, असे सांगितले जात असल्याचे चित्र आहे.

हमी भावापेक्षा खरेदी दर निम्मे

सोमवारी खरेदी दर व हमी भाव पाहिले तर मोठी तफावत त्यात दिसून आली. कापसाला पाच हजार ८०० रुपयांचा दर घोषित केला असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार हजार २०० ते चार हजार ५०० रुपयांचाच भाव दिला जात आहे. अशाच प्रकारे उडीदासाठी सहा हजार हमी भाव जाहीर झाला असताना शेतकऱ्यांच्या हाती तीन ते साडे तीन हजार रुपयांचाच दर पडला. मुगाला सात हजाराचा भाव असताना तीन हजार ५०० ते चार हजार रुपयेच भाव दिला जात आहे. मक्याला एक हजार ८५० रुपये हमी भाव घोषित असताना शेतकऱ्यांना ९०० ते एक हजार रुपये भाव मिळाला. एवढी मोठी तफावत प्रत्येक कृषी मालात असून शेतकऱ्यांसाठी हमी भाव म्हणजे केवळ घोषणाच ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अनंत अडचणींचा सामना

कृषी मालाचा विचार केला तर मोजक्याच पिकांना हमी भाव दिला जातो. अजूनही ९० ते ९५ टक्के पिकांना हमी भावाची घोषणाच होत नाही. उडीद, मूग, मका, कापूस, सोयबीन, हरभरा व इतर मोजक्याच पिकांना हमी भावाची घोषणा होते. मात्र या कृषी मालाचीही पूर्ण खरेदीच होत नाही त्यामुळे हमी भाव दूरच राहतो. खरेदी केंद्रावरदेखील विक्रीचा विचार केला तरी तेथे एकतर गोदामात जागा नसते, बारदाण नसतात, अशा अनेक अडचणींचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

—————————-

कृषी मालासाठी हमी भावाची केवळ घोषणा केली जाते. प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांना घोषित झालेला भाव मि‌ळत नाही. हमी भावासाठी घालण्यात येणाऱ्या अटी यामुळे शेतकरी मेटाकुटीस येतो.

- किशोर चौधरी, शेतकरी तथा अध्यक्ष, नवनिर्मिती शेतकरी मंडळ, असोदा.

केंद्र सरकार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमी भाव देते. तो अजून वाढविला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. मात्र अजून पाचच टक्के काम झाले असू ९५ टक्के काम सरकारने मार्गी लावावे.

- हर्षल चौधरी, शेतकरी.