शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा अपक्ष

By admin | Updated: October 20, 2014 10:01 IST

अमळनेर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या प्रवाहाविरुद्ध कौल देत जनमानसात रुजलेल्या पक्षांना नाकारून पुन्हा एकदा अपक्ष उमेदवाराला संधी दिली आहे.

अमळनेर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या प्रवाहाविरुद्ध कौल देत, भाजप, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, शिवसेना यासारख्या जनमानसात रुजलेल्या पक्षांना नाकारून पुन्हा एकदा अपक्ष उमेदवाराला संधी दिली आहे. निवडणुकीत धनशक्तीचा जोर राहिला असला तरी, जनशक्तीही परिवर्तनासाठी एकवटली होती हेदेखील तेवढेच खरे आहे. तरुण व मराठेतर असलेल्या चौधरींनी दीड वर्षातच आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. सर्वप्रथम त्यांनी नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणले. तेव्हाच विधानसभेचे निकालही अनपेक्षित लागू शकतील याची चुणूक मिळाली होती. पालिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांनी शहरात काही प्रमाणात कामेही केली. त्याचा परिपाक म्हणून, मतदारांनी त्यांना भरघोस मतदान केले. शिवाय या निवडणुकीला अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक असाही रंग दिला गेला होता. अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी निवडण्याची ही संधी असल्याची भावनिक साद घातली गेली, त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला. राज्यात युती-आघाडीची जागा वाटपावरून बोलणीच सुरू राहिल्याने, या मतदारसंघातील भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे ठरत नसताना, चौधरींनी योग्य नियोजनाद्वारे इतर पक्षांच्या मानाने प्रचारातही आघाडी घेतली. त्याचा परिपाक विजयात झाला. आघाडी-युती फिसकटल्याने, चारही पक्ष स्वतंत्र लढले. भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. या निवडणुकीत कॉँग्रेसचे अस्तित्वही दिसले नाही. कॉँग्रेसच्या उमेदवाराला चारअंकी संख्या मोठय़ा मुश्किलीने गाठता आली. यावरून अमळनेर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे अस्तित्व किती शिल्लक राहिले आहे, याची सहज कल्पना येऊ शकेल. शिवसेनेने ऐनवेळी निवडणुकीचे शिवधनुष्य उचलले. मात्र ते त्यांना पेलवले नसले तरी, निवडणुकीत सेनेची कामगिरी ही कॉँग्रेसपेक्षा वरचढ ठरली, एवढी त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे. खरी लढाई भाजप व राष्ट्रवादी यांच्यात होणार अशी अपेक्षा होती. मात्र चौधरींनी या दोन पक्षांच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले होते. भाजपचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना नगरपालिकेच्या कारभाराचा मोठा फटका बसला. डॉ.बी.एस. पाटील यांच्या स्वगृही परतण्याने भाजपाला फायदा होईल ही अपेक्षाही फोल ठरली. राष्ट्रवादीचे सहयोगी असलेले साहेबराव पाटील यांनी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने, त्यांच्याबद्दलही एकप्रकारे नाराजीच होती. ही नाराजी मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. एकला चलो रे ही भूमिका मतदारांना जास्त दिवस चालत नाही, हे या निकालातून दिसून आले. अन्य पक्षांच्या उमेदवारांची मतदारांनी फारशी दखलही घेतलेली नाही. त्यांची उमेदवारी नावालाच राहिली.