शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात पिकांना रात्रीचा पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST

शेतकरी बांधवांतर्फे दिवसा विज पुरवठा होण्याबाबत अनेकवेळा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठा दिल्यावर सब ...

शेतकरी बांधवांतर्फे दिवसा विज पुरवठा होण्याबाबत अनेकवेळा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठा दिल्यावर सब स्टेशन ओव्हलोड होऊन सिस्टीम ढासळण्याची शक्यता असल्याने दिवसा विज पुरवठा देणे टाळण्यात येत आहे. या संदर्भात शासनाने दिवसा विज पुरवठा करण्यासाठी सर्वच यंत्रणा दुप्पट करण्याची शेतकऱ्यांची मागणी असून, याबाबत शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमधुन नाराजी निर्माण होत आहे.

रात्रीचे भारनियमन जीवघेणेच :

दिवसभर शेतात राबराब राबुन, पुन्हा बागायतदार शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायला जावेच लागते. रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी देतांना कुठल्याही स्वरूपाचा अपघात घडण्याची शक्यता असते. , रानडुक्कर, बिबट्या यासह साप व इतर हिंस्र पाण्याचा हल्ला होण्याची भिती असते. तसेच विजेचा शॉक लागण्याचीही भिती असते.

इन्फो :

शेतकऱ्यांना दिवसा शेतात काम करून, पुन्हा रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. रात्रीच्यावेळी काम करतांना हिस्त्र प्राणी किंवा इतर जलचर प्राण्यांचा धोका असतो. मात्र, तरीदेखील शेतकरी बांधव जीव धोक्यात घालून पिकांना देतात. शासनाने बाराही महिने दिवसा विज पुरवठा देणे गरजेचे आहे.

कशोर चौधरी, शेतकरी.

इन्फो :

शेतकरी बांधवांना विज पुरवठा करण्यासंदर्भात हे राज्य पातळीवरच धोरण ठरविण्यात येते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला विज पुरवठा करण्यात येतो, शेतकऱ्यांना कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठ्याबाबत शासन स्तरावरच निर्णय घेण्यात येईल.

फारुख शेख, अधिक्षक अभियंता, महावितरण.

चांगला पाऊस झाल्याने मुबलक पाणी :

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगला पाऊस झाल्याने, विहिरी फुल्ल भरलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच शेतकरी आता जुन पर्यंत वर्षभर पिके घेतील. पावसाळी हंगाम संपल्यानंतर आता हिवाळी हंगामासाठी तयारी करतील. उन्हाळी हंगामातील पिकांना जास्त भाव मिळत असल्याने, शेतकरी गहू व हरभरा पिके काढण्यावर जास्तीत जास्त भर देतात.

- जळगाव तालुक्यात गिरणा नदी असल्यामुळे या नदीचाही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. नदीच्या परिसरातील विहिरींना बाराही महिने मुबलक पाणी असते. पाऊस कमी पडला तरी या विहरींना वर्षभर पाणी असते. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्षभर पिके घेतात. दरम्यान, यंदा पाऊस चांगला झाला असल्यामुळे नदीलाही जास्त आवर्तने सोडण्यात येणार असल्याने यंदा पाणी मुबलक राहणार आहे.