शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सेवा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST

नाव लेखक - डॉ. पंकजकुमार नन्नवरे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिन. सन ...

नाव

लेखक - डॉ. पंकजकुमार नन्नवरे, संचालक,

राष्ट्रीय सेवा योजना २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिन. सन १९६९ मध्ये याच दिवशी सुरू झालेल्या या सामाजिक उत्तरदायित्व

प्रवासाला म्हणता-म्हणता ५२ वर्ष झाली आहेत. योजनेचा प्रारंभ करण्याबाबतची संकल्पना ही राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील युवकांनी विशेषत: महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय युवकांनी देशातील लोकांच्या सेवेसाठी काही रचनात्मक कार्य केले पाहिजे. सन १९६९ मध्ये एक पायलट स्वरूपात देशभरातील केवळ ३७ विद्यापीठात आणि केवळ ४० हजार विद्यार्थ्यांसाठीच ही योजना होती. हळूहळू ही योजना विस्तारित होत गेली. महाराष्ट्रात २७ कृषी विद्यापीठे, आरोग्य विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे, तंत्रविद्यापीठ, मत्स्य व इतर महाविद्यालये मिळून ३ लाख २७ हजार ७०० रासेयो स्वयंसेवक सध्या राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत आहेत. आजमितीस संपूर्ण भारतात ३१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रीय सेवा योजनेत ३२ लाखापेक्षा जास्त स्वयंसेवकांचा सहभाग आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे त्याचे ग्रामीण भागासाठी संबंध वृद्धिंगत व्हावे व त्यांचा सर्वांगीण व्याक्तिमत्त्व विकास घडवून आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. स्वावलंबन, चारित्र्य संवर्धन व सामाजिक बांधीलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पद्धतीत घडवून आणण्यासाठी दरवर्षी २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान रासेयो सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या

सप्ताहाभरात रासेयो एकक असलेल्या महाविद्यालयांमध्ये स्पर्धा आयोजित करून हा रासेयो सप्ताह साजरा करतात. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य हे समाजसेवेशी निगडित असून यामध्ये सहभागी स्वयंसेवक हे आपत्ती व्यवस्थापन, साथरोग, संसर्गजन्य आजार, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती संकटकाळी येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जातात. ते आपल्या शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमातदेखील सहभागी होत असतात.

राष्ट्रीय सेवा योजना एकक महाविद्यालयांतर्फे तीन वर्षासाठी एक गाव दत्तक घेण्यात येत असते. दत्तक गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक इत्यादी विविध समस्यांवर स्वयंसेवकाद्वारे काम केले जाते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले की, खेड्याकडे चला या मूलमंत्राच्या अनुषंगाने जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना एककांद्वारे त्या त्या दत्तक गावात कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा सुरू करण्यात येत आहे.

हम सब मिलकर देश का अपने जग में नाम जगायेंगे।।

एनएनएस का परचम लेकर आगे बढते जायेंगे।।

राष्ट्रीय सेवा योजनेच्या या गीतात म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेचे हे स्वयंसेवक हे रासेयोचा संदेश घेऊन भारतमातेचे नाव उंचाविण्यासाठी प्रयत्न करतच राहतील यात शंका नाही.