शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

वाहन चालवितांना मोबाईल काॅल म्हणजे यमराजाला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:11 IST

जळगाव : दुचाकी, चार चाकी वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या ...

जळगाव : दुचाकी, चार चाकी वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नये आणि जर अति आवश्यक फोन असेल तर वाहन थांबवून बोलावे. पण तरीही मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.

जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाहन चालवित असताना मोबाईलवर बाेलणा-या २ हजार ४७० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनधारकांकडून एकूण ४ लाख ९४ हजार ४०० रूपयांचा दंडही पोलिसांनी वसूल केला आहे. मागील वर्षी १ हजार ३५२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन चालविताना मोबाईलवर बोलणा-यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.

दरम्यान, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उजव्या हातात गाडीचे हॅण्डल आणि डाव्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. तर काही गाडी चालवित असताना संदेश वाचत असतात. मोबाइलवर बोलणे आणि वाहन चालविणे या दोन्ही क्रिया सोबत असतील तर सहाजिकच मोबाइलवर बोलण्याकडे चालकाचे अधिक लक्ष जाते. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात होऊ शकतो. त्यामुळे अशांना पकडण्याची विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच मोबाइल जप्त केले तर अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे.

२०० रू. दंड

वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना पोलिसांनी पकडल्यास २०० रुपये दंड आकारला जातो. ही दंडाची रक्कम कमी असल्याने अनेकदा वाहनचालक मोबाइलवर बोलताना आढळून येतात. मात्र चिरीमिरी देऊन त्यांना सोडून दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारवाईची भीती कमी झाली असल्याचे दिसून येते.

मागील वर्षी जिल्ह्यात वाहतूक पोलिसांकडून १ हजार ३५२ मोबाईलवर बोलवणा-या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ७० हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावर्षी मोबाईलवर बोलणार्यांची संख्या वाढली आहे. अकरा महिन्यात तब्बल २ हजार ४७० वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आली. काही वाहनधारकांचे लायसेन्स देखील निलंबित करण्यात आले आहे.