शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

गिरणेच्या आवर्तनाचा बायपासच्या कामाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बायपास या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात बनवलेला कच्चा पूल वाहून गेल्यामुळे या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रविवारी बायपासचे काम पूर्णपणे थांबले असून अजून आठवडाभर हे काम थांबण्याची शक्यता आहे.

गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी आवर्तन सोडण्यात आले आहे. रविवारी हे आवर्तन आव्हाणे येथे पोहोचले. बायपासच्या कामासाठी बनवण्यात आलेला तात्पुरता कच्चा पूल या पाण्यामुळे वाहून गेल्याची घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गालगत तयार होणाऱ्या बायपासचे काम रविवारी पूर्णपणे ठप्प झाले होते. या कामाला गेल्या काही दिवसांपासून वेग आला आहे. मात्र शनिवारी रात्री गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे कच्चा पूल वाहून गेला आहे. यासह शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला पूलदेखील वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या शेतांमध्ये जायला शेतकऱ्यांनादेखील रस्ता उरलेला नव्हता.

नदीच्या पाण्यामुळे अनधिकृत वाळू उपसाही थांबला

शनिवारी गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे आव्हाने, निमखेडी, खेडी या भागात सुरू असलेला अनधिकृत वाळूचा उपसा तात्पुरता थांबला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रात १०० ते २०० डंपरद्वारे अनधिकृत वाळूचा उपसा सुरू होता. मात्र गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे हा उपसा काही अंशी थांबला आहे. दरम्यान, आवर्तनामुळे गिरणा काठावरचा गावांमधील पाणीटंचाईची समस्यादेखील काही अंशी मार्गी लागली आहे. यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांनादेखील या आवर्तनामुळे फायदा होणार आहे.