शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणच्या संघर्षाला यश आले. मात्र, त्यानंतर आलेले ठाकरे सरकार सुप्रीम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणच्या संघर्षाला यश आले. मात्र, त्यानंतर आलेले ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप शिव संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी गुरुवारी अजिंठा विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच २ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला असून त्यानंतर राज्यभरात मराठा समाज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारादेखील आमदार मेटे यांनी दिला आहे.

अंदाज समिती दौऱ्याच्या निमित्ताने आमदार विनायक मेटे जळगावात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत शिव संग्राम संघटनेची भूमिका मांडली. त्यांच्यासोबत संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे उपस्थित होते. यावेळी मेटे म्हणाले की, ५ मे रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता तीन महिने उलटले, पण ठाकरे सरकारने न्यायालयाने सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील केले नाहीत. उलटपक्षी केंद्र सरकारने १०२ च्या दुरुस्तीमध्ये आणखी सुधारणा करून राज्याचे अधिकार वाढवून दिला. निदान राज्य शासन मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सोयीसुविधा देऊन दिलासा देण्याची अपेक्षा होती. मात्र, ती देखील फोल ठरली आहे.

राज्य सरकार पाण्यात बसलेली म्हैस

मराठा आरक्षणाच्याबाबतीत कुठलाही निर्णय न घेणारे ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या म्हशीला आता उठविण्यासाठी शिव संग्राम संघटनेसह मराठा समाजाची बैठक झाली आहे. त्यानुसार ठाकरे सरकारला २ सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास २ सप्टेंबरला राज्यभर धरणे आंदोलन त्यानंतर मेळावे व मोर्चे काढण्यात येतील तर गणपती विसर्जनानंतर मुंबईत मराठा समाज उपोषणाला बसणार असून आरक्षण मिळाल्याशिवाय हे उपोषण थांबणार नसल्याचा इशारादेखील आमदार मेटे यांनी दिला. मराठा समाजाच्या बैठकीत आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत असलेल्या अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करण्याचा तसेच तत्काळ आरक्षणासाठी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करणारे ठराव करण्यात आले. मात्र, त्याकडेदेखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोपही मेटे यांनी केला.