शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Election 2019 :...मग पाच वर्षात शिवसेनेने काय केले? शरद पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 11:22 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : बुधवारी सकाळी जळगावातील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांचा शिवसेनेवर घणाघात

जळगाव - आता ७/१२ कोरा करणार आहात, मग पाच वर्षे सत्तेत राहून शिवसेनेने  काय केले, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. काल झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते, त्यावरून शरद पवार यांनी शिवसेनेला हा टोला लगावला आहे. बुधवारी सकाळी जळगावातील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते म्हणाले की, ''निवडणुकीत पाच वर्षात काय केले आणि पुढे काय करणार हे सांगायचे असते. आता माझा ७/१२ कोरा झाला काय? हे मला घरी जाऊन पहावे लागेल.''दरम्यान, ''भाजप - सेनेला रोखण्यासाठी मुक्ताईनगरसह दोन - तीन ठिकाणी  बंडखोर उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याचे पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने कोथरुड मतदारसंघातून माघार घेतली होती. त्यानंतर, खडसेंच्या कन्या निवडणूक लढवत असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनीही धक्कादायक माघार घेतली आहे. पक्ष आदेश असल्याने माघार घेण्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना पवारांनी याचं कारण सांगितलं. राज्यातील काही मतदारसंघातून अशा उमेदवारी माघार घेण्यात आल्याचे पवार म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मुक्ताईनगर  विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र बदलले असून, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांची आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या भाजप उमेदवार रोहिनी खडसे यांच्यात सरळ-सरळ लढत रंगणार आहे. दुसरीकडे पक्षाकडून माघारीचे आदेश आल्याने स्वत: रवींद्र पाटील हे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठविणार असल्याची भूमिका मांडली होती. तर राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी विनोद तराळ यांनी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या जळगाव दौऱ्यात विधासनभा निवडणुकांमधील माघार याबद्दल भाष्य केले. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव