शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 14:53 IST

ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

प्रशांत भदाणे 

जळगाव - ओबीसी आणि मुस्लिमांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. म्हणूनच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकत नाही. त्यामुळे ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील फैजपूर येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत केला.

जोपर्यंत संसदेत भाजपचा खासदार आहे तोपर्यंत मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, असंही अमित शाह यावेळी म्हणाले.या सभेला भाजप नेते गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. फैजपूर येथील जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर ही सभा पार पडली.

अमित शाह भाषणात नेमकं काय म्हणाले?

सर्वांची माफी मागतो, मला यायला उशीर झाला

भाजपचा जाहीरनामा घोषित करायचा होता, म्हणून उशीर झाला... माफ करा

आजचा 10 नोव्हेंबरचा दिवस महत्वाचा आहे, पूर्ण देश शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो

1659 मध्ये शिवाजी महाराजांनी आजच्याच दिवशी अफजल खानाचा वध केला होता

आजच्या दिवशी मी आवाहन करतो, शिवरायांच्या विचारांवर काम करणाऱ्या महायुतीला पाठिंबा द्या

आमच्यासमोर असणाऱ्या विरोधकांना लोकांशी काही देणं घेणं नाही, त्यांना फक्त सत्ता हवी आहे

शिवरायांच्या विचारांवर आधारित महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य बनवायचं आहे

काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र लढतयत

राहुल गांधी सावरकरांचा विरोध करतायत 

उद्धव ठाकरेंना आव्हान, तुमच्यात दम असेल तर राहुल गांधींकडून सावरकर यांच्याबद्दल दोन शब्द चांगले बोलून दाखवा

आमची युती ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शिवरायांच्या विचारांवर पुढे नेणारी... महाराष्ट्राला समृध्द करणारी

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देण्याचा दावा

म्हणजे 50 टक्के आरक्षण कमी करण्याचा घाट, ओबीसी आणि दलितांच्या आरक्षणाचा लाभ कमी करण्याचा प्रयत्न

सत्ता हवी म्हणून विरोधक आंधळे झाले आहेत

पण जोपर्यंत संसदेत भाजपचा खासदार आहे तोपर्यंत मायनॉरिटीला आरक्षण मिळू देणार नाही

कलम 370 आम्ही हटवले तेव्हा सर्व विरोधक काव काव करत होते

हे कलम काढले तेव्हा विरोधक म्हणायचे खुनाच्या नद्या वाहतील पण 6 वर्षे झाली कुणाची हिंमत झाली नाही काही करण्याची

पुरी आणि पुलवामामध्ये हल्ला झाला तेव्हा आपण ठोस कारवाई केली, 10 दिवसात पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला

देशाच्या सुरक्षेला आम्ही महत्व दिलंय

अयोध्येत राम मंदिर बनायला हवं होतं की नाही

काँग्रेसने, शरद पवारांनी 70 वर्षे राम मंदिर हा विषय लटकवून ठेवला होता

मोदींनी पाचच वर्षात केस जिंकली आणि मंदिर बांधलं

साडे पाचशे वर्षानंतर पहिल्यांदा रामलल्लाने आपल्या मंदिरात दिवाळी साजरी केली 

फक्त राम मंदिर नाही, तर औरंगजेबने तोडलेले काशी विश्वनाथ कॉरिडॉर केला

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी चांगलं काम केलंय

वक्फ बोर्डाच्या विषयावर मोदींनी निश्चय केलाय

सोनिया, मनमोहन आणि शरद पवारांनी त्यांची सत्ता असताना महाराष्ट्राला किती निधी दिला...

फक्त 1 लाख 91 हजार कोटी 

मोदींनी त्यांच्या काळात 10 लाख 90 हजार कोटी दिले

उत्तर महाराष्ट्रासाठी आम्ही अनेक कामे केली

महाविकास आघाडीने लाडकी बहिण योजनेचा विरोध केला, त्यांचं सरकार आलं तर या योजनेचा लाभ बंद करतील

आमचं सरकार आलं तर 1500 ऐवजी 2100 रुपये लाभ देऊ

महाराष्ट्रात उद्योग येत नाहीये हा विरोधकांचा आरोप आहे 

जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर होता

महाराष्ट्राला नंबर एकवर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल

महायुतीला समर्थन द्या

आमच्या सर्व विरोधकांना मोठ्या बहुमताने निवडून द्या

मोदींचे हात मजबूत करा, देशाला सुरक्षित करा

मुस्लिम आरक्षणाला अटकाव करा

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४JalgaonजळगावAmit Shahअमित शाहBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीraver-acरावेर