शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘लोकमत’ने घडवली गुरू-शिष्याची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 19:17 IST

‘लोकमत’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरू संत सखाराम महाराज यांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज व शिष्य मोहन बेलापूरकर महाराज यांची भेट घडवून अडीचशे वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.

ठळक मुद्दे संत सखाराम महाराज यात्रोत्सव सोशल मीडियातून प्रसाद महाराज व बेलापूरकर महाराजांची भेट

अमळनेर, जि.जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेरच्या संत सखाराम महाराजांच्या यात्रेवर कोरोनामुळे विरजण पडले आहे. ‘लोकमत’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरू संत सखाराम महाराज यांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज व शिष्य मोहन बेलापूरकर महाराज यांची भेट घडवून अडीचशे वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. दोन्ही संतांनी ‘लोकमत’चे आभार मानले.वैशाख महिन्यात अमळनेरला बोरी नदीच्या वाळवंटात मोठा यात्रोत्सव साजरा होत असतो. एकादशीला रथोत्सव मिरवणूक होते. त्यावेळी राज्यातून दोन ते अडीच लाख भाविक अमळनेरात येत असतात. यंदा रथोत्सव ४ रोजी होणार होता. परंपरेप्रमाणे वैशाख मध्ये पांडुरंगाचे वास्तव्य अमळनेरला असते म्हणून संत सखाराम महाराजांचे शिष्य बेलापूरकर महाराज अमलनेरला येत असतात आणि गुरू शिष्याला वेशीवर जाऊन त्यांचे स्वागत करण्याची अडीचशे वर्षांची परंपरा आहे. ३ रोजी बेलापूरकर महाराज अमळनेर येणार होते. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मोहन बेलापूरकर महाराज अमळनेर येऊ शकत नाहीत व अमळणेरचे वाडी संस्थान कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने प्रसाद महाराज बाहेर येऊ शकत नाही म्हणून ही परंपरा खंडित होण्याची भीती होती. गुरू शिष्याच्या भेटीचा हा सोहळा भक्त पाहू शकत नसले तरी ‘लोकमत’चे फोटोग्राफर महेंद्र पाटील आणि तालुका प्रतिनिधी संजय पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघं गुरू शिष्यांची भेट घडवून आणली. दोघा संतांनी परंपरा खंडित होऊ दिली नाही. म्हणून ‘लोकमत’चे आभार मानले आहेत आणि दोघांनी संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्त व्हावा, अशी प्रार्थना पांडुरंगाला केली आहे.रथाच्या आदल्या दिवशी ३०० कि.मी. अंतरावरून मोहन बेलापूरकर महाराज वेशीवर आल्यानंतर गुरू प्रसाद महाराज त्यांचे आर.के.नगर भागात जाऊन स्वागत करतात. तेथून शिग्राममध्ये दोन्ही गुरू शिष्य यांना बसवून मिरवणूक काढली जाते. ठिकठिकाणी रांगोळी, पान सुपारीने स्वागत केले जाते. नंतर दिंडी तुळशी बागेत जाते. त्या दिवसापासून वाडी मंदिरात देवासमोर दररोज बेलापूरकर महाराज कीर्तन करीत असतात. संत सखाराम महाराजांची पुण्यतिथी साजरी करतात. द्वादशीला अम्बरशी टेकडीवर जात असतात व पालखीनंतर दुसºया दिवशी काल्याच्या किर्तनाने सांगता करतात.यंदा मात्र मंदिरात दररोज भजन होणार आहे. ४ रोजी एकादशीला रथ मिरवणूक होणार नाही. रथ धुवून घेतला असून, लालजी व देवांची मूर्ती पूजा करून बाहेर काढून रथाभोवती प्रदक्षिणा घालून शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे.-हभप प्रसाद महाराज, सखाराम महाराजांचे अकरावे गादी पुरुष,अमळनेरपंढरपूर येथे संत सखाराम महाराजांच्या संस्थांमध्ये पुण्यतिथी साजरी करून आठ दिवस दररोज तेथेच कीर्तन होऊन काल्याच्या कीर्तनाने सांगता केली जाईल.-मोहन महाराज बेलापूरकर (संत सखाराम महाराजांचे वारसदार शिष्य)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAmalnerअमळनेर