शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

सुख समृद्धीचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठा गौरीचे उद्या आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानंतर सुख-समृद्धी व सौभाग्याचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठा गौरींचे अर्थात महालक्ष्मीचे रविवार १२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नशिराबाद : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानंतर सुख-समृद्धी व सौभाग्याचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठा गौरींचे अर्थात महालक्ष्मीचे रविवार १२ रोजी आगमन होणार आहे. १३ रोजी सोमवारी महालक्ष्मी गौरींचे पूजन व महानैवेद्य अर्पण करण्यात येईल व १४ रोजी मंगळवार गौरी विसर्जन होईल. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे आवाहन केले जाते. पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होत असते. परंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो. काही कुटुंबांमध्ये धान्यावर बसलेल्या तर काहींकडे उभ्या महालक्ष्मीला दागिने तसेच मुखवटे घालून सजावट करण्यात येत असते. त्यांना विविध शृंगार करीत सजविली जाते.

ईन्फो

यंदा रविवारी अनुराधा नक्षत्रावर म्हणजे सकाळी ९.५० मिनिटांनंतर गौरी आवाहन करता येणार आहे. ज्येष्ठा नक्षत्र सोमवारी ८.२३ मिनिटांनंतर असल्याने पूजन करावे. त्यादिवशी नेहमीप्रमाणे गौरी पूजन व महानैवेद्य अर्पण करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने १४ रोजी सकाळी ७.०५ मिनिटानंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठरावीक वेळेची मर्यादा नसते, मात्र यावर्षी आवाहन व विसर्जनाकरिता मर्यादा दिलेली आहे. त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल. यंदा मंगळवार असला तरीही विसर्जन परंपरेप्रमाणे करता येईल, तसे मोहन दाते यांनी सांगितले.

गौर आली गौरी

गौरी आवाहनासाठी अंगणात सडासंमार्जन करून रांगोळीने गौरींचे हळदी कुंकवाचे पावले काढली जातात. त्यावर लक्ष्मीचे विविध प्रकारचा उल्लेख करण्यात येत असतो. त्यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो. गौर आली गौरी कशाच्या पावलांनी आली, गाई वासरांच्या पावलांनी आली ही आठ पावले असून त्यात आपल्या गरजेनुसार वैभव, अलंकार, सुखसमृद्धी, आदी शब्दांचा उल्लेख करण्यात येत असतो.

ज्येष्ठा लक्ष्मीचे पूजन महानैवेद्य

कुटुंबात लक्ष्मीचा वास राहून सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य सुख-समृद्धी घरात नांदावी यासाठी गौरीपूजन, अर्चन, करण्यात येते. ज्येष्ठा नक्षत्रावर केवडा, पडवळ, कमळाचे फूल सोळा प्रकारची पत्री, विविध पुष्पांनी लक्ष्मीचे पूजन करण्यात येते. पुरणपोळी लाडू, करंजी, सोळा प्रकारचे भाज्या अनारसे, सांजोरी यासह अन्य पंचपक्वान्नांचा महानैवेद्य देवीला अर्पण करण्यात येत असतो. ज्वारीचे पीठ, ताकापासून तयार करण्यात आलेले अंबिलाचा महानैवेद्याला महत्त्व आहे.