शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जळगाव जिल्ह्यात यंदा टंचाई आराखड्यात टँकर संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:52 AM

२१३ कोटींचा प्रस्ताव : २९१ गावांना ३५६ योजना प्रस्तावित

जळगाव : यंदा झालेल्या अतिवृष्टी व सरासरीपेक्षा दीडपट पावसामुळे पाणीपातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात टँकरच्या संख्येत घट होणार आहे. दरम्यान जि.प.ने २०१९-२० साठी २१२ कोटी ६८ लाखांचा प्राथमिक टंचाई आराखडा तयार केला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हापरिषदेकडून संभाव्य टंचाईवरील उपाययोजनांचा आराखडा मागविला जातो. त्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूरी देऊन टंचाई विभागाच्या नियंत्रणाखाली या आराखड्याची अंमलबजावणी केली जात असते. यंदा पावसाळाच खूप लांबल्याने व निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आराखड्याचे काम थोडे लांबणीवर पडले आहे.२९१ गावांचा ३५६ उपाययोजनांचा आराखडाजि.प.कडून संभाव्य पाणीटंचाई आरखडा तयार करण्यात येत असून तो अंतीम टप्प्यात आले. सुमारे २१२ कोटी ६८ लाखांचा हा टंचाई आराखडा असून त्यात २९१ गावांचा समावेश असून त्यात टंचाई निर्मुलनासाठी सुमारे ३५६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असल्याचे समजते.टँकरच्या संख्येत होणार घटमागील वर्षी तीव्र पाणीटंचाई असल्याने जिल्ह्यात गत १५ वर्षातील तीव्र दुष्काळ होता. त्यामुळे तब्बल २२१ टँकर द्वारे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पावसाळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सरासरीच्या १४० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले, विहीरींना पाणी अजूनही कायम आहे. फेब्रुवारीपर्यंत त्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी शक्यता असल्याने यंदा टँकरच्या संख्येत कपात होण्याचा अंदाज आहे.चाºयाची मात्र टंचाई जाणवण्याची भिती... यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात चारा टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. कृषी विभागाला मागील वर्षी डीपीडीसीतून ६० लाख रूपये चारा बियाणांसाठी दिले होते. त्यातून धरणांच्या आटलेल्या पाणीसाठ्यामुळे गाळाच्या जमिनीवर तसेच शेतकºयांनी शेतात चाºयाची लागवड केली होती. सुमारे २ हजार हेक्टरवर चारा लागवड केल्याने चाराटंचाईवर मात करता आली होती. त्यामुळे गुरूवारी झालेल्या ‘आत्मा’च्या बैठकीत यंदा नियोजनमधून १ लाख २० हजारांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मंजूर झाल्यास ४ हजार हेक्टरवर चारा लागवड शक्य होऊन चाराटंचाईच्या समस्येवर मात करता येईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव