शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:59 IST

जिल्ह्यात १६ रोजी एकाच दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली असून या पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नाशी गाठली आहे.

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यात बळीराजा सुखावलाजळगावातील धरण साठ्यातही वाढदीड महिन्यात सरासरी गाठण्याची अपेक्षा

जळगाव : जिल्ह्यात १६ रोजी एकाच दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली असून या पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नाशी गाठली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. इतकेच नव्हे धरणसाठ्यातही वाढ होण्यास मदत झाली आहे. मात्र पावसाळ््याचा केवळ दीडच महिना शिल्लक असल्याने यंदा सरासरी एवढा पाऊस होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तापी नदीला पूर आल्याने हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. धरणात मात्र ३९.४१ टक्केच पाणीसाठा आहे. पाण्याची मोठी आवक असली तरी धरणाचे दरवाजे उघडून ते पाणी सोडून देण्यात आले. पावसाळ्याच्या शेवटी हे धरण भरले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.वाघूर नदीला पहूर, वाकोद परिसरातून नाले, ओढ्यांचे पाणी येऊन मिळाल्याने नदी वाहती झाली. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात किमान १० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वाघूर धरणावर जळगाव शहराची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. धरणात सध्या ३६.३६ टक्के पाणीसाठा आहे. या सोबतच गिरणा धरणातही ३०.३४ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस