शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:59 IST

जिल्ह्यात १६ रोजी एकाच दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली असून या पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नाशी गाठली आहे.

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यात बळीराजा सुखावलाजळगावातील धरण साठ्यातही वाढदीड महिन्यात सरासरी गाठण्याची अपेक्षा

जळगाव : जिल्ह्यात १६ रोजी एकाच दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली असून या पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नाशी गाठली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. इतकेच नव्हे धरणसाठ्यातही वाढ होण्यास मदत झाली आहे. मात्र पावसाळ््याचा केवळ दीडच महिना शिल्लक असल्याने यंदा सरासरी एवढा पाऊस होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तापी नदीला पूर आल्याने हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. धरणात मात्र ३९.४१ टक्केच पाणीसाठा आहे. पाण्याची मोठी आवक असली तरी धरणाचे दरवाजे उघडून ते पाणी सोडून देण्यात आले. पावसाळ्याच्या शेवटी हे धरण भरले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.वाघूर नदीला पहूर, वाकोद परिसरातून नाले, ओढ्यांचे पाणी येऊन मिळाल्याने नदी वाहती झाली. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात किमान १० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वाघूर धरणावर जळगाव शहराची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. धरणात सध्या ३६.३६ टक्के पाणीसाठा आहे. या सोबतच गिरणा धरणातही ३०.३४ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस