शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादला जाणवतेय बेअरस्टोची उणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:18 IST

एक असा संघ जो गुणतक्त्यात सर्वात खालच्या स्थानावर आहे. आणि पात्रता फेरी गाठण्याची त्यांच्याकडे संधी नाही. अशा संघाकडे गमावण्यासारखे ...

एक असा संघ जो गुणतक्त्यात सर्वात खालच्या स्थानावर आहे. आणि पात्रता फेरी गाठण्याची त्यांच्याकडे संधी नाही. अशा संघाकडे गमावण्यासारखे काहीही नसते. हैदराबादच्या संघाने या सत्रात खूपच खराब खेळ केला आहे. पंजाबविरोधात १२५ धावांसमोर हैदराबादचा संघ अशा पद्धतीने कमी पडला जसा तो या आधीच्या प्रत्येक सामन्यात होता. डेव्हिड वॉर्नरच्या खराब फॉर्मपेक्षा हैदराबादच्या संघाला जॉनी बेअरस्टोची उणीव भासत आहे. जॉनी संघाला वेगाने सुरुवात करून देत होता. आणि संघात त्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण होत होते.

जेव्हा कोणताही खेळाडू खराब फॉर्ममधून जात असतो. तेव्हा काहीच योग्य होत नसते. अशात तो एक फलंदाज म्हणून बाद होण्याचे विचित्र मार्ग निर्माण करतो.

वॉर्नर यूएईमध्ये पहिल्या सामन्यात बॅटची कड घेऊन जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला होता. पंजाबच्या शमीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर शॉट मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. आशा आहे की तो उरलेल्या सामन्यात चांगली सुरुवात करू शकेल. हैदराबादने त्यासोबतच आक्रमक फलंदाजांऐवजी तांत्रिकदृष्ट्या योग्य फलंदाजांना खेळवायला हवे. तांत्रिक फलंदाज हे हिटरपेक्षा जास्त चांगली सुरुवात करून देऊ शकतात. हिटर एखाद्या सामन्यात चालतात आणि महत्त्वाच्या वेळी चुकीचा फटका मारून बाद होतात.

त्या तुलनेत राजस्थानचा संघ जरा चांगला आहे. मात्र या संघाला खेळात सातत्य ठेवता आले नाही. राजस्थानचे खेळाडू सोशल मीडियावरच जास्त व्हायरल होत आहेत. संजू सॅमसन एक चांगला माणूस आणि कर्णधार आहे. मात्र त्याला खेळाडूंना हे सांगावे लागेल की मैदानावर आनंद व्यक्त करण्याच्या वेगळ्या मार्गापेक्षा क्रिकेटमधील यशाने व्हायरल होणे हे जास्त महत्त्वाचे असते. तीन सर्वोत्तम खेळाडूंची भरपाई करणे कठीण आहे. जोस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे गेम चेंजर आहेत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत राजस्थानला बिलकुल मदत मिळत नाही. युवा खेळाडूंना हे शिकायला हवे की स्टोक्स मैदानावर त्याचे शंभर टक्के देतो. सध्याच्या काळात तो सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तो त्याच्या खेळाप्रति खूपच गंभीर आहे आणि संघाप्रति समर्पित आहे. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून शिकण्याची गरज आहे.

पंजाबच्या विरोधातील कार्तिक त्यागीचे अखेरचे षटक हे चांगले राहिले. मात्र आता तो भूतकाळ झाला. त्याला अशी कामगिरी पुन्हा पुन्हा करावी लागेल. त्यामुळे राजस्थानच्या संघाला प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मिळेल.