शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने शहर होणार प्लॅस्टिकमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:06 IST

प्रदूषणावर मात करण्यासाठी पुढाकार

जळगाव : प्लॅस्टिक कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट होत नसल्याने व ते जागोजागी पडून प्रदूषण वाढत असल्याने त्यावर मात करण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने कचरा गोळा करीत शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याची मोहीम आकाराला येत आहे. यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेतला असून महानगरपालिकेशी चर्चा करून ही मोहीम राबविली जाणार आहे.राज्यात विविध प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी शहरासह अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांसह वेगवेगळ््या प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर झाला तरी त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे शहरात जागोजागी प्लॅस्टिकचा कचरा पडलेला दिसतो व पर्यावरणास बाधा पोहचत आहे.केवळ चांगल्या प्लॅस्टिकची विल्हेवाटप्लॅस्टिकच्या बºयाच वस्तूंपैकी केवळ प्लॅस्टिक बाटल्या व चांगल्या प्रकारच्या प्लॅस्टिकची भंगारात खरेदी केली जाते. मात्र बारीक प्लॅस्टिक पिशव्या, बिस्कीट, खाद्य पदार्थांचे आवरण अशा बहुतांश प्रकारच्या प्लॅस्टिकला मागणी नसते. परिणामी ते रस्त्यावर कोठेही पडलेले असते. सोबतच कचराकुंड्यांमधून कचरा वेचणारे हे प्लॅस्टिक उचलत नाही. त्यामुळे ते अस्ताव्यस्त झालेले दिसते. त्यातून गटारी, नाले यामध्ये पाणी साचणे असे प्रकार घडत असतात. हे टाळल्यास प्लॅस्टिकचा त्रास होऊ शकत नाही. त्यासाठी जळगावातील उद्योजक सरसावले आहेत.शालेय विद्यार्थ्यांमार्फत लावणार शिस्तशालेय विद्यार्थ्यांना कोणतेही काम सांगितल्यास त्याची योग्य अंमलबजावणी होऊन ते प्रभावीपणे राबविलेदेखील जाते. यासाठी आता प्लॅस्टिक कचरा मुक्तीसाठीही विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आपापल्या घरून कचरा संकलन करून तो शाळेत आणण्यास सांगितला जाणार असून तेथून तो एकत्रितरित्या संकलित केला जाईल व त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल, अशी ही योजना राहणार आहे.महापालिकेशी चर्चाप्लॅस्टिक रिप्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशनने यासाठी पुढाकार घेतला असून महापालिकेसोबत ही मोहीम राबविली जाणार आहे. यात मनपा आयुक्तांशी प्राथमिकस्तरावर चर्चादेखील करण्यात आली असून लवकरच ती प्रत्यक्ष आकाराला येईल, असे सांगितले जात आहे.बाटल्यांना आला भाव२००१पर्यंत प्लॅस्टिक बाटल्यांना मागणी नव्हती. मात्र या बाटल्यांवर प्रक्रिया होऊ लागली व त्यांना मागणी वाढून ३० ते ५० रुपये प्रती किलोने भाव मिळू लागला. त्यामुळे या बाटल्यांना मागणी वाढल्याने त्या शक्यतो कचरा म्हणून कोठे फेकल्या जात नाही. अशाच प्रकारे इतरही प्लॅस्टिकला मागणी वाढल्यास हा कचरा आपसूकच कमी होईल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.प्लॅस्टिक कचºयाची व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नसल्याने तो कोठेही पडलेला असतो. हे टाळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आपापल्या घरून प्लॅस्टिक कचरा एकत्रित करून तो शाळेत आणण्यास सांगण्यात येऊन तेथून तो संकलित केला जाईल. त्यामुळे शहरातील प्लॅस्टिक कचरा नष्ट होण्यास मदत होईल. मनपाच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जाईल.- विनोद बियाणी, अध्यक्ष, प्लॅस्टीक रिप्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव