शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

‘नाते सांभाळले, अन् त्याच्या अंगाशी आले..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:25 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘कायद्यातील गमती-जमती’ या सदरात अॅड. माधव भोकरीकर यांचा विशेष लेख.

घटना 1961 सालातील. शेतक:याच्या गजबजलेल्या घरातील. चारपाच भावंडातील मोठा भाऊ देवाला प्रिय झाला. एकत्र कुटुंबाची जबाबदारी हिंदूसंस्कृतीप्रमाणे नंतरच्या भावाकडे आली. मोठय़ा भावाचा एकच मुलगा. आई अगोदरच सोडून गेली होती. आईबापाविना पोरगा सांभाळला काकाने, काकूने. त्यांना एकच मुलगी. काकाने कर्तव्यात कधी कसूर केली नाही. भाऊबहिणीच्या नात्यात कधी चुलतपणा डोकावला नाही. नातं सख्खच राहिलं. मुलाचे लग्न झाले. सुनबाईची पावलं लक्ष्मीची पावलं बनून आली. काकाला जबाबदारीतून मोकळे झाल्यासारखे वाटले. इतर भावांना मिळकतीतील हिस्से दिलेले होतेच. आईबापाविना पोराला सांभाळता काका त्याच्यातच केव्हा राहू लागले, समजले नाही. मुलीचे लग्न झाले. सासरी गेली. लग्नात भावाने कसली उणीव पडू दिली नाही. यापूर्वीच काकाने त्याच्या हिश्श्यातील जमिनी, घरे विकली; थोडी जमीन, एकदोन घरे होती. पुतण्याचाही हिस्सा याच्याजवळच होता. काका-पुतणे वेगळे नातेच नव्हते. काका कर्तेपणाच्या जबाबदारीतून मुक्त झाला. जबाबदारी पुतण्याने सांभाळली. काकाला वेगळे राहण्याची आवश्यकताच नव्हती, विचारही नव्हता. पुतण्या, काकाला बाप म्हणूनच सांभाळू लागला. मुलगीपण अधूनमधून बापाला भेट घ्यायला यायची. जावईबापूंच्या पाहुणचारासहीत पुतण्या, त्याची प}ी बघायची. काकाला समाधान वाटायचे. आपल्या पश्चात मुलीची काळजी नाही. मनाशीच खूश व्हायचा, देवाचे आभार मानायचा. ‘माङयानंतर तुङोच आहे सगळे. माझा भरवसा नाही. कुठे नाव लावण्यासाठी तलाठय़ाकडे अर्ज द्यायचे असतील तर दे’. म्हातारा समाधानाने म्हणायचा. पुतण्या समजूत काढायचा. अर्जफाटे झालेच नाही, कोणतीही वाट न पहाता देवाने काकाला बोलावून घेतले. सन 1992 दरम्यानची गोष्ट. पुतण्याने काकाचे अंत्यसंस्कार केले. पितृऋण फेडले. मुलीला बापाचे समजले. आली, चार दिवस राहिली. बापाचे जाण्याने झालेले दु:ख हलके केले. निघून गेली. वर्ष-दीड वर्ष झाले. एके दिवशी भावाला बहिणीची तालुका कोर्टामार्फत नोटीस आली. बहिणीने दावा केला. वर्ष 1993. बापाची मिळकत मिळावी, एकमेव वारस म्हणून. लहानपणापासून सख्खे-चुलत माहीत नसलेली भावंडं, मिळकतीसाठी कोर्टात होते. कायदा बहिणीच्या बाजूने असेल पण समाजाचा पाठिंबा भावाच्या बाजूने होता. भावाने लहानपणापासून काकाने स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळले. आपणही काकासोबत वडिलांप्रमाणेच व्यवहार केला. बहिणीच्या लग्नात कायकाय केले. काका कित्येक वेळा ‘शेतीबाडी, घरे नावावर करून घे,’ हे सांगत असतानादेखील केले नाही. मनात पाप नव्हते. त्याचा, त्याच्या वडिलांचा हिस्सापण काकाजवळच होता सांगितले. दोन्ही बाजूने भरपूर कागदपत्रे रंगली. हिंदूवारसा कायद्याप्रमाणे मुलीला वडिलांच्या मिळकतीत हक्क मिळाला. सन 2005 मध्ये दाव्याचा निकाल बहिणीच्या बाजूने लागला. भावाला वाईट वाटले. बहिणीच्याकडील मंडळी खूश होती. भावाने तालुका न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयांत दाद मागितली. जिल्हा न्यायालयाने तालुका न्यायालयाचाच निकाल 2011 मध्ये कायम केला. भावाला वाईट वाटले. संतापही आला. ‘काकाचे केले ते मिळकत मिळण्यासाठी नाही’ त्यावेळी बहीण काय करत होती. फक्त मिळकत हवी, जबाबदा:या नकोत.’ मनात भाऊ पुटपुटू लागला. (पूर्वार्ध)