शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भूजल संकटाच्या घशात अडकली मक्याची कणसे, गव्हाची ओंबी व हरभऱ्याचे घाटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 13:15 IST

रावेर तालूक्यातील सातपुड्याच्या पायथ्यापासून ते थेट तापीमाईच्या सुपीक पठाराच्या उशाशी हतनूरसह सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी अशा लहान मोठी सहा धरणे असली तरी अत्यल्प, अनियमित व अकाली झालेल्या पावसामुळे यंदा उन्हाळ्यातील एप्रिल - मे जाणवणारी भूजलाचे संकट गत डिसेंबरच्या उत्तरार्धापासूनच घोंघावू लागले आहे.

रावेर - तालूक्यातील सातपुड्याच्या पायथ्यापासून ते थेट तापीमाईच्या सुपीक पठाराच्या उशाशी हतनूरसह सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी अशा लहान मोठी सहा धरणे असली तरी अत्यल्प, अनियमित व अकाली झालेल्या पावसामुळे यंदा उन्हाळ्यातील एप्रिल - मे जाणवणारी भूजलाचे संकट गत डिसेंबरच्या उत्तरार्धापासूनच घोंघावू लागले आहे. तालूक्याच्या पुर्व भागातील खानापूर, निरूळ, पाडळे, चोरवड, कर्जोद, या भागासह सुकीकाठचा परिसरात भूजलसंकटाची  कमालीची गंभीर दाहकता निर्माण झाली असून, या दीड महिन्यात सहा ते सात मीटरने भूजलपातळी घसरल्याने धरणांच्या या तालूक्यात मका गहू, हरभऱ्यासह १९ हजार हेक्टरमधील रब्बी हंगामाचा घास भूजलसंकटाच्या घशात अडकला असून आजमितीस शेतकरीबांधव कमालीचे चिंताक्रांत झाले आहेत.                रावेर तालूक्याला केळीच्या समृद्धीचे गतवैभव असलेल्या खर्‍या यशाचे गमक हतनूर, सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी या लहानमोठी धरणांच्या सप्तजलतारकांना जाते. यंदा पाऊस अकाली,अपुर्ण व अनियमीतपणे झाल्याने ही धरणं नुसतीच आकडेवारीने १०० टक्के तुडूंब भरलीत. पण भूजलपातळी वृध्दींगत करण्यासाठी  पावसाळ्यात पुरांअभावी सातपुड्यातून वाहून येणाऱ्या सुकी, भोकर, नागोई, मात्राण नद्या नाले मात्र दुथडी भरून न वाहिल्याने भूजल सिंचनाचा प्रश्न " आ"वासूनच राहिला.           परिणामतः  भर पावसाळ्यात डोळे वटारणार्‍या पावसाने शेवटच्या दोन तीन पावसात १०० टक्के पर्जन्यमान व  धरणे १०० टक्के तुटूंब भरल्याची माहिती दर्शवली जात असली तरी सात धरणांचा तालूका असलेल्या या तालुक्यात एवढी सात धरणं उशाशी असूनही, डिसेंबर- जानेवारी  पूर्वार्धापासूनच या तालुक्याच्या दाही दिशांना भूजलसंकटाची भीषण दाहकता प्रशासनाची व शासनाची झोप उडवणारी ठरली आहे. त्यात भरीस भर म्हणून तालूक्याच्या पुर्व भागातील चोरवड, अजनाड, खानापूर, निरूळ व पाडळे परिसरात राजकीय इच्छाशक्तीअभावी सिंचनाचा अनुशेष आ वासून असल्याने भूजलाच्या संकटाने उग्र स्वरूप धारण केले आहे. खानापूर - चोरवड-निरूळ परिसरात तब्बल ५ ते १० मीटरने भूजलपातळी मकरसंक्रांतीच्या पर्वणीवर होणाऱ्या सूर्याच्या संक्रमणातच घसरली असल्याने गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याची घाटे पोषणाच्या अवस्थेत असतांनाच, रब्बीच्या हंगामासाठी पाणी व्यवस्थापन मोडकळीस आल्याने रब्बी हंगामाचा घास भूजलसंकटाच्या घशात अडकला आहे. किंबहुना, रब्बीच्या हंगामाचा ऐन तोंडी आलेला घास निसर्गाचे दृष्टचक्र हाती येवू देते की नाही असे भयानक भूजलाचे संकट गडगडत असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे.          तालुक्यातील रब्बीच्या हंगामासाठी १० हजार ६०० हेक्टर हरभऱ्याचे, तर साडेचार हजार क्षेत्र गव्हाचे, साडेचार हजार हेक्टर क्षेत्र मक्याचे असून एकूण सुमारे १९ हजार हेक्टरमधील रब्बीच्या हंगामाचा घास भूजलसंकटाच्या घशात अडकला असून, शासनाने व लोकप्रतिनिधींनी तत्संबंधी गंभीर दखल घेऊन तातडीने उद्भवणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी शेतकरीहितासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचा सूर जनमानसातून व्यक्त होत आहे.  कालच, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सात धरणांचा तालूका अन् समृध्दीचा असलेल्या वारस्याचा धागा पकडत रावेर, यावल व चोपडा तालूके सर्वाधिक भूजल उपसणारे तालूके असल्याने मेगारिचार्ज प्रकल्पाची सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांनी कार्यपुर्ती न झाल्यास तीघही तालूक्यात वाळवंट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी वर्तवलेली गंभीर दाहकता शासनाचे लक्ष केंद्रित केले होते. 

टॅग्स :Jalgaonजळगाव