शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

स्वातंत्र्य हे मोफत नव्हे तर नियंत्रण रेषेवरचा सैनिक त्याची किंमत मोजत असल्याची जबाबदारी बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 1:16 AM

अधिकार व जबाबदारीला आम्ही स्वातंत्र्य समजून स्वातंत्र्याची किंमत मोजत नसल्याची शोकांतिका आहे. बेभानपणे, बेजबाबदारपणे उन्मत्त व उन्मादाने तथा भ्रष्टाचाराने आपण वागत असल्याचे मोठे दुर्दैव आहे म्हणून स्वातंत्र्य हे मोफत नसून त्याची जबाबदारी आपण स्वीकारून जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्याची जात, पात, धर्म, पंथ, भाषा, रक्त हे सर्वस्वाचे आपले राष्ट्र असल्याचा जोश, दृढभावना व आत्मबळ असलेला नियंत्रण रेषेवरील सैनिक चुकवत असल्याची जाणीव ठेवून देशातील विघातक शक्तींना हाणून पाडण्याची गरज पुणे येथील लक्ष्य फाऊंडेशनच्या व्याख्यात्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देरावेर येथे रंगपंचमी व्याख्यानमालेत अनुराधा प्रभुदेसाई यांनी दिला तरूणाईला कानमंत्र‘ऋणानुबंध सैनिकांशी - कारगील शौर्यगाथा’ या विषयावर गुंफले दुसरे पुष्प

रावेर, जि.जळगाव : अधिकार व जबाबदारीला आम्ही स्वातंत्र्य समजून स्वातंत्र्याची किंमत मोजत नसल्याची शोकांतिका आहे. बेभानपणे, बेजबाबदारपणे उन्मत्त व उन्मादाने तथा भ्रष्टाचाराने आपण वागत असल्याचे मोठे दुर्दैव आहे म्हणून स्वातंत्र्य हे मोफत नसून त्याची जबाबदारी आपण स्वीकारून जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्याची जात, पात, धर्म, पंथ, भाषा, रक्त हे सर्वस्वाचे आपले राष्ट्र असल्याचा जोश, दृढभावना व आत्मबळ असलेला नियंत्रण रेषेवरील सैनिक चुकवत असल्याची जाणीव ठेवून देशातील विघातक शक्तींना हाणून पाडण्याची गरज पुणे येथील लक्ष्य फाऊंडेशनच्या व्याख्यात्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूलच्या रंगमंचावर आयोजित रंगपंचमी व्याख्यानमालेत ‘ऋणानुबंध सैनिकांशी - कारगील शौर्यगाथा’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. भवरलाल अ‍ॅड.कांताई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशनने हे व्याख्यान प्रायोजित केले होते.प्रारंभी पुण्याच्या व्याख्यात्या प्रभुदेसाई, चेअरमन प्रा.प्रकाश मुजूमदार, माजी सैनिक पांडूरंग माळी, पिंटू महाजन, हेमेंद्र नगरीया, प्रतीक महाजन यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. संयोजकांतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक विश्र्वस्त दिलीप वैद्य यांनी केले.व्याख्यानाचे पुष्प गुंफताना त्या म्हणाल्या, लक्ष्य फाऊंडेशनने देश हा धर्म आणि सैनिक हीच जात मानून ४ आॅक्टोबर २००४ रोजी स्थापन सैनिकांसोबत दिवाळी, सैनिकांसोबत व्हॅलेंटाईन डे, सैनिकांविषयी जनजागृती करण्यासाठी पुस्तकांचे प्रकाशन व शाळा महाविद्यालयतून जनजागृती करून जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवण्याचे कार्य करीत असल्याची ओळख करून दिली. त्यांनी सैनिक अनुभवला, दिसला व भावल्याचे स्पष्ट करून त्यांच्या डोळ्यात अंगार आणि प्रेम पाहील्याची अनुभूती विषद केली. त्यांचे प्रेम प्रखर राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रभक्तीत पाहील्याचे स्पष्ट केले. कारगील युध्दात शत्रु उंचावरून तोफांमधून व हवेतून शस्त्रांचा हल्ला करीत असताना आम्ही पर्वतावर चढत राहीलो. भारतीय सैनिकांचे रक्त सांडले पण अन् थिजले पण, तरीही मागे खचून परतलो नाही. कारण आमच्यातील राष्ट्राभिमान हीच खरी ताकद असल्याचा गौरव त्यांनी केला.आयुष्यात आपण हसत घेतले तर कोणते ही ध्येय गाठणे अशक्य नसल्याचे सांगत, सीमेवरचा जवान जोश होगा तो होश होगा और सांस होगी तो आस होंगी. अशी दुर्दम्य इच्छाशक्ती प्रकट करीत असल्याचा अनुभव त्यांनी कथन केला. सफोरहून कंदहारकडे जातांना पूर्वीच्या भेटीतला जवान ओंकार हा जेंव्हा मला ‘साखरेचे पोते... वीस रुपये किलो..’ या आनंदाची गोडी सांगणारे ब्रीदवाक्य बोलून गेला तेंव्हा त्याने तो आता लेफ्टनंट कर्नल ओंकार असल्याची ओळख देत, मी आता मावशी तुलाच नाही तर माझा सारा देश खांद्यावर घेतोय.. असे जबाबदारीने व आत्माभिमानाने बोलला तेंव्हा खरोखर मन गहिवरून आले. रस्त्यात दहशतवाद्यांचा हल्ला २० मिनिटे सुरू होता. जन्म मृत्यूची टांगती तलवार होती. नागरिकांवर हल्ला चढवून जवानांना विचलीत करण्याचा प्रयत्न पाकिस्तानींकडून सुरू होते. तेव्हा माज्या पावलावर पाऊल ठेवून या, असे सांगून कव्हर करणारा सैनिक मला परमेश्वरच वाटत असल्याचा आत्मानुभव त्यांनी कथन केला.लडाखमध्ये रस्ते मरो या मारो असे रस्ते. तुर्तूक, झिंग्राल या पोस्ट १९६२ मध्ये आपल्या १०० सैनिकांविरूद्ध चिनी १००० सैनिकांनी युध्द पुकारून आपले राष्ट्रीय ध्वज व सैनिकांचे मृतदेह पँगाँगच्या बर्फाळ किनारा भारतीय सैनिकांच्या रक्ताने माखून लाल झाला होता. मात्र तोच किनारा थ्री इडियट्स चित्रपटात प्रदर्शित करण्यात आल्याने आता करीना पॉईंट म्हणून ओळखला जातोयं. एवढे साधे हौतात्म्य नव्हते त्या आमच्या अनाम वीरांचे. म्हणून त्या वीरांच्या हौतात्म्यासाठी आपल्या मनात तरी घर उभे राहावे अशी सादही त्यांनी श्रोत्यांच्या मनात घातली.सीमा नियंत्रण रेषेवर पीओके जवळ रूस्तम पोस्ट होती. - ५६ ते ५६ डिग्री सेल्सिअस मध्ये काम करतात. फजल, पुंछ, रजौरी अख्नूर, बहादूर पोस्टला भेटी देऊन जवानांशी ऋणानुबंध जोपासल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरखा जवान आजारी असल्याने ७२ तास हजर होता. पाच मिनीटे झोप चाटून गेली असता पाकिस्तानी सैनिकाने त्याची रायफल पळवली.जागी होताच त्याने पाकिस्तानी सैनिकाचे काजवे चमकवून बंदूक परत आणली. तेव्हापासून त्या चौकीला बहादूर चौकी तर पाकिस्तानी चौकीला उल्लू चौकी म्हणून ओळखले जाते.चीन सीमेवर ना बंदूक चाहिये ना तलवार चाहिये, गढवाली के खून मे उबाल चाहीए... अशा अरुणाचल- नागालँड तथा सीयाचीन ग्लॅशियर या चीन सीमारेषावर ३०० किमी वारे, - ५६ डिग्री सेल्सिअस तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीत ऋतु बदललेले तरी कर्तव्य एकच असल्याने आमचा जवान नियंत्रण रेषेशी प्रणय करीत असल्याचे आत्मसमर्पण त्यांनी व्यक्त केले.भारतीय वायुसेना व पायदळाचे बळावर कारगील युध्द लढले गेले. असंख्य पायदळ जवान प्रतिकूल परिस्थितीत मारले गेले. १८ हजार फूट उंचावरून शत्रूला नमवणे. ४०० पेक्षा जास्त सैनिक शहीद व असंख्य जायबंदी झाले होते. ओठात विजयाचे गाणं होतं आणि पायात देशाची शान होती. कॅप्टन मनोज कुमार पांडे चौथे बंकर उद्ध्वस्त करून शहीद झाले. कॅप्टन विक्रम बात्रा यांनी मस्कूल नाला चौकीवर पॉईंट ४८७५वर तिरंगा फडकावला पण जल्लोषात विक्रम बात्रा नव्हते. त्यांच्या नावाने तो पॉईंट आजही ओळखला जातो. टायगर हिल जिंकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. टायगर हिल सर करण्यापुर्वी तो जिंकण्यासाठी १६० रॉकेट्सचा हल्ला हिलटॉपवर स्वत:च्या दिशेने चढविण्याचे फर्मान काढून स्वत: चा जीव धोक्यात घालून टायगर हिल पाकिस्तानी सैन्याला नमवून जिंकल्यांचा भारतीय सेनेचा गौरव त्यांनी व्यक्त केला.आपली प्रसारमाध्यमे देशातील राजकारण, पाश्चात्य खेळ व मनोरंजनापलीकडे जवान व किसान यांचा गौरव करण्यात मागे असल्याची खंत व्यक्त करून आजच्या तरुणाईला जाज्वल्य इतिहासाची ओळख होवू शकत नसल्याची शोकांतिका त्यांनी व्यक्त केली. सीआरपीएफ चेतन चिता या जवानाची हिमंत आणि धाडसाचे कौतुक करीत त्याने लष्कर ए तैय्यबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चाळणी होवूनही १६ राऊंड फायर करत लढा दिल्याची शौर्यगाथा व्यक्त केली.सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी, तर आभार प्रतीक महाजन यांनी मानले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर