शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

डमी - जिल्ह्यातील ९४ टक्के नुकसानग्रस्त शेतक-यांना मिळाली आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST

जळगाव : जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना ...

जळगाव : जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ९४ टक्के शेतकर्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. परिणामी राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी दिवाळीपुर्वी विशेष आर्थिक मदत जाहीर केली होती.

ही मदत थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी १८ कोटी ८० लाख १० हजार रूपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली होती. जिल्हा प्रशासनाकडे ही मदत प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ बीडीएसद्वारे तहसीलदारांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली. तहसीलदारांनाही ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार जिल्ह्यातील ४१ हजार ८९८ शेतकर्यांच्या खात्यावर १७ कोटी ६० लाख ९० हजार १९५ रूपये वर्ग करण्यात आले. जिल्ह्यातील एकुण ९४ टक्के शेतकर्यांना रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

तालुुकानिहाय वितरित रक्कमेची टक्केवारी

भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि चोपडा तालुक्यातील शेतकर्यांना १०० टक्के नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. तर जळगाव तालुक्यात ९२.६३, जामनेर ९९.९३ एरंडोल ८६.८५, धरणगाव ९०.२८, पारोळा ९८.३३, यावल ९५.८८, रावेर ८९.८३, अमळनेर ९६.२६, पाचोरा ८६.८७, भडगाव ९९.९८ आणि चाळीसगाव तालुक्यात ९७.४० टक्के भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. एकूण १७ कोटी ६० लाख ९० हजार १९५ रूपये वर्ग करण्यात आले आहे.

-मदतीसाठी वर्ग केलेली रक्कम

१७ कोटी

-प्रशासनाला प्राप्त झालेला निधी

१८ कोटी

-जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी

४१,८९८