शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

देशाभिमान जपण्याची नितांत गरज : कर्नल अरविंद जोगळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:14 PM

इस्त्राईल आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्ष झाली. मात्र इस्राईलने झपाट्याने प्रगती केली, कारण त्या देशातील लहान मुलालादेखील स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत माहीत असल्याचे सेवानिवृत्त सेनाधिकारी कर्नल अरविंद जोगळेकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देअमळनेर येथील शारदीय व्याख्यानमालेत गुंफले पहिले पुष्पमराठी वाङ्मय मंडळातर्फे व्याख्यानमालेचे आयोजनदेशविदेशात दिली ३०० पेक्षा जास्त व्याख्याने

महेंद्र रामोशे।अमळनेर : इस्त्राईल आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्ष झाली. मात्र इस्राईलने झपाट्याने प्रगती केली, कारण त्या देशातील लहान मुलालादेखील स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत माहीत असल्याचे सेवानिवृत्त सेनाधिकारी कर्नल अरविंद जोगळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ते शहरातील मराठी वाङ्मय मंडळाच्या शारदीय व्याख्यानमालेसाठी व्याख्याते म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीपर्यत पोहचविण्यासाठी आपण आजपर्यंत देश-विदेशात ३०० च्यावर व्याख्याने दिल्याचे त्यांनी सांगितले.वयाच्या ७० व्या वर्षानंतर लेखनाला सुरुवात कशी झाली याविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, ५६ वर्षापर्यंत भारतीय सैन्य दलात सेवा केली.सेवानिवृत्तीनंतर संगणक घेऊन प्रत्यक्ष सेनेत कर्तव्य करीत असताना आलेले अनुभव मांडायला सुरुवात केली आणि त्यानंतर ११ पुस्तके लिहिली. आज साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.ज्येष्ठांविषयी बोलताना ते म्हणाले ज्येष्ठांनी त्यांना जीवनात मिळालेली शिदोरी आजच्या तरुण पिढीसाठी सोडून दिली पाहिजे. तरुण पिढीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन सैन्य दलात भरती व्हावं अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रश्न विचारण्याची शक्ती थांबली तेव्हा माणूस संपतो असेही त्यांनी सांगितले. आयुष्यात आपण एक फार्म भरला, एक परीक्षा दिली, आणि एकच नोकरी केली, असे अभिमानाने सांगत त्यांनी अनेक चित्रपटात काम केल्याचे म्हटले.कर्नल जोगळेकर यांचा १९६५ आणि १९७१ च्या भारत पाक युद्धासह श्रीलंकेत शांतता सेनेत व मालदीव मोहिमेत सहभाग होता. त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.जवळपास १५ चित्रपटातून आणि जाहिरातीतून अभिनय केला आहे. २६ / ११ च्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ताज हॉटेलमध्ये त्यांचे ‘१९४७ ते एके ४७’ या विषयावर भाषण झाले ते प्रचंड गाजल्याची आठवण त्यांनी सांगितली. देशाभिमान जागविण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.

टॅग्स :Amalnerअमळनेर