शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST

सहा संघटनांचा सहभाग : अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवणार जळगाव : कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही शासनाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अद्याप फ्रंटलाइन ...

सहा संघटनांचा सहभाग : अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवणार

जळगाव : कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही शासनाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अद्याप फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा न दिल्याने महावितरणच्या विविध संघटनांतर्फे सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

महावितरणमधील सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने प्रशासनाला नोटीस देऊनही वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्यासह इतर मागण्या मान्य न केल्याने कृती समितीतर्फे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. सोमवारी या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण मुख्य कार्यालयासमोर तर काही पदाधिकाऱ्यांनी दीक्षितवाडीतील कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कामबंद आंदोलन केले. तसेच जिल्ह्यातील सर्व वीज कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत काळ्या फिती लावून, कार्यालयातच हजर राहिले. सामाजिक बांधीलकी जपत केवळ अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा अखंडित चालू ठेवणे, कोविड हॉस्पिटल व त्यासंदर्भातील माहिती देणे या कामाव्यतिरिक्त इतर सर्व कामे बेमुदत बंद ठेवली असल्याचे सबाॅर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी यांनी कळविले आहे.

महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात सबाॅर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे सहसचिव कुंदन भंगाळे, सहसचिव वाय.सी. भंगाळे, सर्कल सचिव देवेंद्र भंगाळे, सुहास चौधरी, विभागीय सचिव मिलिंद इंगळे, मोहन भोई, विशाल आंधळे, विकास कोळंबे, वर्कर्स फेडरेशनचे वीरेंद्रसिंग पाटील, तांत्रिक कामगार संघटनेचे आर.आर. सावकारे, कामगार महासंघाचे ज्ञानेश्वर पाटील, चतुर सैंदाणे, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनचे प्रदीप पाटील, रवी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो :

या आहेत प्रमुख मागण्या

१) वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा द्या.

२) वीज कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रथम लसीकरण करावे.

३) कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या वीज कर्मचाऱ्याला महाराष्ट्र शासनाप्रमाणे ५० लाख अनुदान द्यावे.

४) तिन्ही कंपन्यांकरिता जुन्याच टीपीएची तत्काळ नेमणूक करावी.

५) कोरोनाचा उद्रेक पाहता वीजबिल वसुलीकरिता सक्ती करू नये.