शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:18 IST

किनगाव : यावल तालुक्यातील चिंचोलीसह पश्चिम भागातील आडगाव, कासारखेडा, किनगाव, डांभुर्णी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ...

किनगाव : यावल तालुक्यातील चिंचोलीसह पश्चिम भागातील आडगाव, कासारखेडा, किनगाव, डांभुर्णी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल प्रशासन विभागाने पंचनामे करून शासनाने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पिकांची नुकसानभरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी बांधवांनी केली आहे.

आधीच कर्ज काढून लहान- मोठ्या शेतकरी बांधवांनी खरिपाची पेरणी केली. महागाची खते व बियाणे जमिनीत टाकले. यंदा तरी वरुणराजा पावेल व कर्जाच्या खाईतून सुखरूप बाहेर येईल, अशी आशा शेतकरी धरून बसला होता; परंतु ऐन हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची दैना थांबायचे नावच घेत नसल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.

चिंचोली परिसरात कापसाचे पन्नास टक्के, तर कांदा पिकाचे साठ ते सत्तर टक्के नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे लागवड केलेला कांदा पूर्णत: खराब झाला. कापसाचे पीक लाल पडून खराब झाले असून, शेतात फक्त कापसाच्या काड्याच दिसत आहेत. सोयाबीनची पानेही गळून फक्त सडलेल्या शेंगा तग धरून आहेत. अजून दोन-चार दिवस पाऊस सुरू राहिल्यास सोयाबीनही हातचे वाया जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उडीद, मूग तर तोडण्यासाठी मजूरच न मिळाल्याने शेतकऱ्यांना उडीद शेतातच सोडून द्यावा लागला. एवढे मोठे नुकसान होऊनही शासनाने अद्याप महसूल विभागाला पंचनामे करण्याचा आदेश दिला नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात शासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने शेतकरीबांधवांच्या हिताचा निर्णय घेत निदान ज्या शेतकरी बांधवांचे कापूस, कांदा, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी किनगाव व चिंचोली परिसरातील शेतकरीबांधवांनी केली आहे.