शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाबा, शाळेत केव्हा जायला मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाच्या संकटामुळे मुले सलग दुसऱ्या वर्षी खेळापासून दुरावली आहेत. गेल्या दीड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाच्या संकटामुळे मुले सलग दुसऱ्या वर्षी खेळापासून दुरावली आहेत. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने मुले घरात कंटाळवाणी झाली आहेत. या मुलांना स्वतःच्या घरातच कोरोनाने बंदिस्त करून ठेवले आहे. यामुळे मुले कंटाळून गेली आहेत. शेवटी न राहवून ते आई-बाबांना म्हणतात, ‘कोरोना केव्हा जाणार आणि शाळा केव्हा सुरू होणार? बाबा, मला खेळायला जायचं. आई, मला शाळेला जायचं... मुलांच्या या म्हणण्यावर आई-बाबा मात्र निरुत्तर होत आहेत.

मुलांच्या जीवनात खेळ आणि सवंगडी यांना खूप महत्त्व आहे. खेळामुळे मुलांचे आरोग्य व मन निरोगी राहते. बालकांना नैतिक धडे सवंगड्यांच्या खेळातून मिळत असतात. खेळ व सवंगडी हे बालपणाच्या जीवनातील अविभाज्य अविस्मरणीय क्षण आहेत; परंतु कोरोना काळात मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. कोठे गावालाही जायला मिळाले नसल्याने नातेवाइकांसह मामाचे गावही पोरके झाले आहे. अनेक दिवसांपासून त्यांना बाहेर सवंगड्यांसोबत, शालेय मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळालेच नाही. त्यातच आता तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होण्याची शक्यता दर्शविल्याने मुलांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरची परिस्थिती वाईट आणि भीतीदायक आहे तर घरातल्या घरात राहून ही मुले एकलकोंडी, चिडचिडी, भांडकुदळ, हट्टी बनली आहेत. काही मुलांना तर मोबाइलशिवाय करमतच नाही. ते आईबाबांना नानाविध प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत.

पालकांची भूमिका महत्त्वाची

आपल्या पाल्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी पालकांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. कोरोना काळात मुलांची शाळा, खेळ व मित्र त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. पालकांना पालकत्व जपून शिक्षक, मित्र, मार्गदर्शकांच्या भूमिका साकाराव्या लागत आहेत. मुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका या वेळेस फारच महत्त्वाची ठरत आहे. त्यातच सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू असल्याने पालक शेतात मोलमजुरीसाठी आणि त्यांची मुले घरी त्यामुळे एकटे एकटे राहून मुलांची कोंडी होत आहे.

पालक प्रतिक्रिया

मुलांसाठी शाळा बंद असल्याने मुले खूपच चिडचिडी बनली आहेत. दिवसभर मोबाइलशी खेळत असतात. मी गवंडी कामाला बाहेर जातो. पत्नी शेतात कामाला जाते. त्यामुळे मुले रिकामी भटकत असतात. तलावावर जातात. वाटेल तिथे फिरतात. लक्ष द्यायला घरी कोणी नसते. हताश झाली आहेत. ‘बाबा, माझी शाळा कधी सुरू होणार?’ असे विचारतात.

- सय्यद इरफान सय्यद रसूल, पालक, गवंडी कामगार