शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

उत्सुकता, हुरहुर अन् शेवटी माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : गावाच्या विकासासाठी संघटनात्मक पुढे येऊन येथील ८२ पैकी ८१ उमेदवारांनी आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नशिराबाद : गावाच्या विकासासाठी संघटनात्मक पुढे येऊन येथील ८२ पैकी ८१ उमेदवारांनी आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणातून सामुदायिक माघार घेतली. ग्रामपंचायत निवडणूक रद्द करून नगरपंचायतची निवडणूक व्हावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी माघारी घेऊन ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची प्रतीक्षा कायमची संपुष्टात आली आहे. नगरपंचायतबाबत कार्यवाही केव्हा सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगर पंचायत रूपांतर होण्याची उद्घोषणा झाल्यानंतर निवडणुकीबाबत संभ्रमावस्था वाढतच होती. निवडणूक आयोगाकडून याबाबत कुठलाही स्पष्ट खुलासा होत नसल्याने उमेदवारांचे व नागरिकांची घालमेल होत होती. निवडणुकीचा तिढा सुटावा याकरता न्यायालयात धाव घेण्यात आली. अखेर सामुदायिक माघारी बाबत नशिराबाद येथे बैठक घेण्यात आली त्या मध्ये सर्वांनी पाठिंबा दर्शविला.

लालचंद पाटील व पंकज महाजन यांचा पुढाकार

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, माजी सरपंच विकास पाटील, माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे, मनसेचे मुकुंदा रोटे, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सय्यद बरकतअली, सुनील शास्त्री महाराज,गणेश चव्हाण ,भूषण पाटील, शिवसेनेचे विकास धनगर, चेतन बराटे, विनोद रंधे,आसिफ मुबलिक, वासिफ भाई, अब्दुल रज्जाक,शेख चॉद शे.अजिज, सचिन महाजन, ललित बराटे, प्रहार''''चे मोहन माळी,अब्दुल सय्यद अ.गनी यांच्यासह गावातील विविध पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उमेदवार यांनी परिश्रम घेतले.

सकाळपासून उमेदवारांशी संपर्क

सकाळपासूनच उमेदवारांशी संपर्क बैठकीत घेतलेल्या ठरावाप्रमाणे सर्वांनीच पाठिंबा देऊन सोमवारी दाखल केलेलं नामनिर्देशन पत्र माघारी घ्यावं यासाठी उमेदवारांना सकाळपासूनच दूरध्वनी करून संपर्क केला जात होता माघारीला उपस्थित रहा अशी विनंती केली जात होती.

संताप आणि हास्याचे फवारे

आधी तू भर मग मी पहिले ते मग मी माघारी घेईल आधी त्यांचा फॉर्म भरा सह्या घ्या नंतर मग मी करेल असे अनेक उमेदवार त्या ठिकाणी सांगत होते. त्यामुळे आधी तू नंतर मी सही करेल फॉर्म भरेल अशा उत्तरामुळे संताप व हास्याचे फवारे उडत होते. प्रत्येक उमेदवारांना माघारीसाठी एकत्र आणणे यासाठी तारेवरची कसरत चांगली झाली. काही उमेदवारांना तर घेण्यासाठी वाहनही पाठवली होती.

सकाळपासूनच मनधरणी व दमछाक

प्रत्येक उमेदवाराला गाव विकासासाठी सर्वांनी एक व्हा असे सांगितले जात होते जळगाव तहसील कार्यालयाजवळ एक एक उमेदवार एकत्र येत होते. दुपारपासून प्रत्येकाला दूरध्वनीवरून बोलवण्याचे काम सुरू होते. दुपारी एक वाजेपर्यंत निम्म्याहून अधिक उमेदवारांनी उपस्थिती देऊन गाव विकासासाठी एकत्र येत होते. मात्र पाठ फिरविणाऱ्या उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी दमछाक उडत होती. काही उमेदवारांनी तर आपला दूरध्वनी बंद करून त्या ठिकाणी येण्याचे टाळत होते अखेर गावातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क करून गाव विकासाची माहिती दिल्यानंतर त्यांनी होकार दर्शविला आणि माघारीसाठी उपस्थिती दिली.

अखेरच्या क्षणाला ऐतिहासिक पाऊल

सकाळपासूनच सुरू असलेल्या कार्याला यशस्वी ठरेल की नाही याबाबत प्रत्येकामध्ये उत्सुकता होती. अखेर दुपारी अडीच वाजेच्या नंतर तहसील कार्यालयामध्ये सर्वांनी माघारीसाठी प्रवेश केला. त्यातही काही जण फितूर होण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनीही गाव विकासाची सात देऊन एकी दर्शवली. शेवटच्या क्षणापर्यंत ८२ पैकी तब्बल ८१ जणांनी माघारीसाठी उपस्थिती दिली. मात्र त्यातही एका महिला उमेदवाराने सर्वांची दमछाक उडवली. अखेरच्या क्षणापर्यंत उपस्थित झाली नसल्याची माहिती मिळाली.

नशिराबादचा आदर्श जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने घ्यावा - गुलाबराव पाटील

नशिराबाद गावाच्या विकासाच्या मुद्यावरून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम आणि अपक्षांनी एकत्र येऊन शेवटच्या दिवशी माघार घेण्याची बाब ही अतिशय कौतुकास्पद असून जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शेवटच्या दिवशी नशिराबादच्या सर्वच्या सर्व ८२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर या सर्वांचे कौतुक केले.

ईडी व बिडीपेक्षा विकास महत्वाचा

दरम्यान, नशिराबाद येथे लवकरच नगरपंचायतीची निवडणूक होणार असून तेथे विकासाचे नवीन पर्व सुरू होईल असा आशावाद देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. तसेच काही नेते ईडी व बीडीवरून वाद करत असले तरी यापेक्षा विकास महत्वाचा असल्याचा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मारला. प्रत्येक उमेदवाराचा माघारीचा फॉर्म भरून ठेवण्यात आला होता. फक्त उमेदवाराला स्वाक्षरी करणे व आधार कार्ड जोडणे इतकेच बाकी ठेवले होते.