शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सावट आणि खरिपाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 18:55 IST

कोरानाच्या सावटातच तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.

मतीन शेखमुक्ताईनगर : कोरानाच्या सावटातच तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने तर काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीचीनांगरनी, वखरनी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतक?्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकऱ्यांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतल्या जाते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे अद्यापही शेतकºयांच्या घरात कापूस भरून आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.खरीप तसेच रब्बी हंगामही तोट्यात गेल्याने यावर्षी शेतकºयांचे आर्थिक गणित चुकले आहे. त्यामुळे आता शेतकºयांची पुढील हंगामावार सर्व मदार आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील शेतीची मशागतीच्या कामाला लागले आहे.बैलजोड्या मिळेनातदिवसेंदिवस शेती करणे कठीण झाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास बैलजोडी, चारा, शेती साहित्य आदी घ्यावे लागते.खरीप पूर्वी अनेक शेतकरी नवीन बैलजोडी बदल करण्यास खरेदी विक्री करतात तर बरेच शेतकरी हंगाम संपल्यावर बैलजोडी विकून नव्या खरिपात नवी बैलजोडी खरेदी करतात यंदा २४ मार्च पासून लॉकडाउनमुळे बाहेरील शेतीपयोगी जनावरे खान्देशात आलीच नाही. त्यामुळे बैलजोडीचे दर कमालीचे वधारले आहेत. त्यामुळे आता शेतकरी कमीत कमी त्रासामध्ये शेतकरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत आहे. मात्र प्रत्येक शेतकºयांनाच आधुनिक पद्धतीने शेती करणे शक्य नसल्याने ते कमी पैशामध्ये पारंपरिक पद्धतीनेच शेतीची मशानगत करीत आहे.लॉकडाऊने कंबरडे मोडलेयावर्षी अवकाळी पावसाने शेतकºयांचा पिछा सोडला नाही. प्रथम खरीप आणि त्यानंतर रब्बीनेही होत्याचे नव्हते झाले. यातून कसेबसे सावरत नाही तोच लॉकडाऊन झाले आणि त्यांना जराशीही हालचाल करता आली नाही. परिणामी पुढील हंगाम कसा करायचा, हा प्रश्न सध्या शेतकºयांना पडला आहे. दुसरीकडे अनेक शेतकºयांना आपल्याकडील पिकवलेले धान्य तसेच कापूसही विकता आला नाही.शेतातही सोशल डिस्टन्सिंगएरवी मशागतीसाठी जाणारे शेतकरी नवा हंगाम बहरेल ही सकारात्मक ऊर्जा घेऊन शेती कामाला लागतात. अशात कोरोना संक्रमणाचा भय शेतात ही कायम आहे. शेतकरी मजूर शेताच्या मशागतीसाठी काम करताना आवर्जून मास्कचा वापर करताना व एकमेकांपासून अंतर राखून काम करताना दिसून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMuktainagarमुक्ताईनगर