शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

राजारामनगरात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

मनपाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन, मात्र उपाययोजना नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा रस्त्यावरील ...

मनपाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन, मात्र उपाययोजना नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा रस्त्यावरील राजारामनगरात गेल्या १० वर्षांपासून मनपातर्फे परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन न टाकल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींनी निवडणुकांच्या वेळी आश्वासने दिली. मात्र, गेल्या दहा वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने आश्वासन पूर्ण केले नसल्याची खंत येथील रहिवाशांनी 'लोकमत' कडे व्यक्त केली.

गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर या परिसरात नागरी वस्ती वाढली. शहराला लागून हा परिसर असला तरी, या भागाची हद्द आव्हाने ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. मात्र, संबंधित ग्रामपंचायतीकडून या ठिकाणी रस्ते, गटारी ना पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात आली असल्याचे रहिवाशांनी सांगितले. मात्र, शहराला लागून हा भाग असल्याने मनपा प्रशासनानेच या परिसरात सर्व मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी या नागरिकांमधून केली जात आहे. निवडणुकीच्या वेळेला लोकप्रतिनिधी येतात आणि पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन देतात. त्यानुसार गेल्या १० वर्षांत अनेक निवडणुका झाल्या. मात्र, एकही लोकप्रतिनिधीने अद्याप पाण्याची समस्या सोडविली नसल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. सध्या उन्हाळा सुरू असल्याने येथील बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट होत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले.

इन्फो:

विकतचे घ्यावे लागतेय पाणी

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून जारचे विकत पाणी घ्यावे लागत आहे. दररोज ५० रुपये खर्च पिण्याच्या पाण्यावर करावा लागत आहे. तर वापरण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. आतापर्यंत पाण्यावर हजारो रुपये खर्च झाला आहे. तसेच या परिसरात गटारी व रस्ते नसल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

इन्फो :

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी तर कधी विकतचे पाणी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यातही या बोअरवेल आटत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे खूपच हाल होत आहेत.

ज्योती भालेराव, रहिवासी

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्यासह रस्ते व गटारींचीही समस्या कायम आहे. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील सर्व समस्या माहीत असतानाही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

लता पवार, रहिवासी

पिण्याच्या पाण्याची मनपाने पाईपलाईन न टाकल्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी तर कधी बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. मनपा व लोकप्रतिनिधी यांनी पाण्याच्या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच रस्ते व गटारीच्या समस्याही सोडवाव्यात.

पंकज सैदाने, रहिवासी

इन्फो

हा परिसर आव्हाने परिसरात असून, ग्रामपंचायत किंवा मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली नाही. त्यामुळे रहिवाशांना बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने पाण्याची समस्या सोडावी, ही आमची मागणी आहे.

नीलेश इंगळे, रहिवासी