शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मंदिरावर सरकारचेच नियंत्रण

By admin | Updated: April 20, 2015 13:03 IST

तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर राज्य सरकारने पूर्ण नियंत्रण मिळविले आहे.

तुळजाभवानी मंदिरावर सरकारचेच नियंत्रणउच्च न्यायालय : पुजार्‍यांची याचिका फेटाळलीतुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर राज्य सरकारने पूर्ण नियंत्रण मिळविले आहे. या संदर्भात प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेला आव्हान देणार्‍या याचिकेस अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा कारभार निजाम राजवटीने १९०९ पासून घालून दिलेल्या देऊळ-ए-कवायत या नियमानुसार सुरू होता. त्यामुळे मंदिराच्या विश्वस्त मंडळाची नोंद धर्मादाय न्यासाकडे असली तरी मंदिराचे सर्व व्यवहार यात नमूद केल्याप्रमाणेच सुरू होते. मंदिराच्या पुजार्‍यांचे हक्क, विविध विधी, भाविकांनी अर्पण केलेल्या देणगी आणि रोख रकमेत असलेले पारंपारिक हक्क तसेच त्याचा विनियोग आदींबाबतचे निर्णय या नियमावलीनुसार घेण्यात येत होते. मात्र, मंदिरातील अनागोंदी आणि गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील अधिकाराचा वापर करीत राज्य शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांची सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था म्हणून घोषणा केलीत्न यामुळे मंदिराचा संपूर्ण कारभार आता सरकारच्या नियंत्रणाखाली आला असून, राज्यातील पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर या मंदिराप्रमाणे तुळजाभवानी मंदिराचाही कारभार राज्य सरकारच्या नियमावलीनुसार चालणार आहे. राज्य सरकारच्या या अधिसूचनेला तुळजापूरच्या पुजारी मंडळाचे युवराज पाटील व इतरांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. अधिसूचनेला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. याबाबतची सुनावणी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. ए. आय. एस. चिमा यांच्या न्यायालयासमोर सुरू असून, या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. (प्रतिनिधी)समितीनेच कारभार पाहावाजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या शासकीय अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या समितीनेच मंदिराचा कारभार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. प्रतिवादींना नोटीस बजावून विधी व न्याय विभागाचे सचिव यांना शपथपत्र सादर करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.