शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

घरात मुले कंटाळली...'कोरोना सुरक्षित शाळा' सुरू व्हावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील प्राथमिक शाळा अद्याप सुरू झालेल्या नाही. यामुळे तब्बल १७ ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील प्राथमिक शाळा अद्याप सुरू झालेल्या नाही. यामुळे तब्बल १७ महिन्यांपासून मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. परंतु, आता अनेक जण घरात कंटाळले असून, त्यांना शाळा हवी आहे. परंतु, अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे या शाळा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे 'कोरोना सुरशिक्षत शाळा' सुरू करण्यास शासनाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता शाळांकडून होऊ लागली आहे़

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नसल्यामुळे ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार १५ जुलैपासून जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या वर्गांची दारे विद्यार्थ्यांसाठी उघडली. त्यानंतर शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भातही शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या़ मात्र, त्यानंतर पुढे शाळा सुरू करण्यासंदर्भात कुठलीही हालचाल झाली नाही.

४५६ शाळांची वाजली घंटा

गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमधील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ७०८ शाळांपैकी सद्य:स्थितीला ४५६ शाळा उघडल्या आहेत. तर ५७०५ शिक्षक, कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असून शेकडो शिक्षकांनी अद्यापही लसीकरण करून घेतलेले नाही. त्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

शाळांना वेतनोत्तर अनुदान मिळत नाही. कोरोनाच्या सद्य:स्थितीत शाळांमधील वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. पण, त्यासाठी निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे सॅनिटायझेशनचे पैसे देणार कोण? असा प्रश्न शाळा व्यवस्थापनांसमोर निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १७ महिन्यांपासून शाळा बंद आहेत़ कोरोना आता किती दिवस राहील सांगता येत नाही. पण, कोरोना सुरक्षित शाळा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळा सुरू करता येतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण नियम सुध्दा पाळले गेले पाहिजे. त्यातच मर्यादित संख्येचा विचार करून शासनाने शाळा नियमित सुरू करावी.

- ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल

००००००००००

आता मुले घरी कंटाळली आहेत. दुसरीकडे पाल्य अभ्यास करीत नाहीत, अशी ओरड पालकांकडून होत आहे. त्यामुळे कोरोनापासून विद्यार्थी सुरक्षित राहतील, यासाठी संपूर्ण सुविधा शाळेत ठेवून वर्ग उघडली जाऊ शकतात. नियमित सॅनिटायझेशन करता येईल व एक दिवसाआड शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाईल. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दोन ते तीन सत्रांमध्ये शाळा भरविता येतील.

- ज्योती गोसावी, मुख्याध्यापिका, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय

एकूण विद्यार्थी

पहिली : ७६५१४

दुसरी : ७९३१३

तिसरी : ७७९१८

चौथी : ८००५०

पाचवी : ७८८२८

सहावी : ७७३११

सातवी : ७७६७७

आठवी : ७६३८५

नववी : ७६३५८

दहावी : ५८३१७

अकरावी : ४५८९४

बारावी : ४९४०३