शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विनापरवाना ३५ नागरिक वापरताहेत बोअरवेलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

वाढीव भागात घरासोबत एक बोअरवेल : भविष्यात भूजल पातळीत होणार मोठी घट ०२ दिवसाआड शहरात पाणीपुरवठा ०५ हजारहून अधिक ...

वाढीव भागात घरासोबत एक बोअरवेल : भविष्यात भूजल पातळीत होणार मोठी घट

०२

दिवसाआड शहरात पाणीपुरवठा

०५

हजारहून अधिक बोअरवेल

६ लाख

शहराची लोकसंख्या

७१ हजार

नळांद्वारे केला जातो पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव - शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत असल्याने जळगावकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत नसले तरी दोन वर्षांपूर्वी शहरात पाऊस न झाल्यामुळे वाघूर धरणातील जलसाठ्यात मोठी घट होऊन, शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. असे असतानाही जळगावकरांना पाण्याचे महत्त्व समजलेले दिसून येत नाही. कारण शहरात ३५ टक्के नागरिक मनपा प्रशासन किंवा भूजल सर्वेक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बोअरवेलचे पाणी वापरत आहेत, तसेच नवीन बोअरवेल तयार करण्याचे काम सुरूच असून, यामुळे भविष्यात शहराच्या भूजल पातळीत मोठी घट होण्याची शक्यता आहे.

शहरातील नीर फाउंडेशनतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. शहरात काही भागांत ५० ते ६० फुटांवर पाणी लागत आहे. काही भागांत ९० फुटांपर्यंत पाण्याची पातळी खाली गेली आहे, तसेच शहरात बेसुमार पद्धतीने बोअरवेल घेण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे ज्याठिकाणी महापालिकेचे नळ कनेक्शन आहे अशा घरांमध्येदेखील बोअरवेल घेण्यात आले आहेत.

मनपा, मजीप्राने झटकले हात

शहरात होणाऱ्या बोअरबेलबाबत कोणत्याही विभागाची परवानगीदेखील घेतली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय नियमानुसार २०० फुटांपेक्षा अधिक खोलीपर्यंत बोअरवेल घेऊ नये अशा सूचना आहेत. मात्र, याची साधी तपासणीदेखील केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे, तसेच महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडूनदेखील याबाबत लक्ष दिले जात नसल्याने कोणीही यावे आणि बोअरवेल घ्यावे, अशीच स्थिती सध्या जळगाव शहरात निर्माण झाली आहे.

याठिकाणी जातेय पाणी वाया

शहरातील नागरिक पाण्याचा वापर गांभीर्याने करीत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील झोपडपट्टी भागात नळांना तोट्या बसविण्यात आल्या नसल्याने नळ आल्यावर भरमसाठ पाणी वाया जाते. शहरात मनपाकडून होत असलेल्या पाणीपुरवठ्यांतर्गत मोठ्या प्रमाणात गळती आहे. मात्र, या गळती वेळेवर दुरुस्त केल्या जात नसल्याने या गळत्तींद्वारेदेखील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

शहरातील वाढीव भागात सर्वाधिक बोअरवेल

१.शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत असून, वाढीव भागात मनपाकडून अद्यापही पाणीपुरवठा केला जात नाही. शहरातील ७० टक्के बोअरवेल हे या वाढीव भागातच आहेत.

२. वाघनगर, राजारामनगर, चंदू अण्णानगर, निमखेडी परिसर, आहुजानगर, खेडी परिसर, रामेश्वर कॉलनी परिसर, पिंप्राळा परिसर, वाटीकाश्रम परिसर, केसी पार्क, महादेवनगर, सत्यम पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदण्यात आले आहेत.

नीर फाउंडेशनचा सर्व्हे काय म्हणतो

शहरातील नीर फाउंडेशनतर्फे शहरातील पाण्याचा वापराबाबत काही महिन्यांपूर्वी सर्व्हे करण्यात आला होता. त्याद्वारे शहरातील पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सरकारी संस्था पुरेशी कामे करीत नसल्याचे ७७ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे, तसेच शहरातील नागरिकांची गरज भागविण्यासाठी जळगाव शहरात पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचे ७६ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे, तसेच जलसंवर्धनासाठी नवीन कायद्याची निर्मिती व्हावी असेही शहरातील ९६ टक्के नागरिकांना वाटते, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. दरम्यान, या सर्वेक्षणादरम्यान शहरातील १ हजार २०० नागरिकांशी चर्चा करण्यात आली.

कोट...

जलपुनर्भरण नावालाच

शहरात पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे, तसेच शहरात ज्याप्रमाणे एका घरामागे एक बोअरवेलची संख्या वाढत आहे. ही बाब भविष्याचा दृष्टीने धोकादायक असून, यावर प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज आहे.

-सागर महाजन, नीर फाउंडेशन

वाया जाणाऱ्या पाण्याचे संवर्धन करण्याबाबत जळगाव शहरात कोणतेही काम सुरू नाही. प्रशासन तर या प्रक्रियेत फारच उदासीन असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे सातपुड्यासारख्या दुर्गम भागात जलसंवर्धनाचे काम सुरू असताना, सुशिक्षित झालेल्या समाजात मात्र याबाबत दुर्लक्ष होत आहे.

-प्रणीलसिंह चौधरी, योगी फाउंडेशन