शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

यावल पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेले महिलांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:13 AM

अडावद ता. चोपडा येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपायाविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी गेल्या १३ आॅगस्टपासून यावल पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलेल्या तिघा महिलांचे उपोषण आज सोडण्यात आले. तक्रारीच्या फेरचौकशीचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी आमदार हरीभाऊ जावळेदेखील उपस्थित होते.

ठळक मुद्देसात दिवसांपासून सुरू होते उपोषणउपचार करवून घेण्याची विनंतीही महिलांनी धुडकावून लावली होती.

यावल जि. जळगाव : अडावद ता. चोपडा येथील पोलीस अधिकाऱ्यासह एका पोलीस शिपायाबाबत केलेल्या तक्रारीची फेरचौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून मिळाल्यानंतर गेल्या ७ दिवसांपासून येथे उपोषणाला बसलेल्या ३ महिलांनी रविवारी आपले उपोषण मागे घेतले.पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपायाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एका पोलीस पत्नीसह तीन महिलांचे येथील पोलीस ठाण्यासमोर गेल्या सात दिवसापासून उपोषण सुरू होते. त्या उपोषणाची रविवारी सांगता झाली आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांच्या उपस्थीतीत नूतन पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारीची अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचेकडून फेरचौकशी करण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषणार्थी महिलांनी आपले उपोषण सोडले. यावेळी उपोषणार्थी महिलांसह एम. बी. तडवी, मुनाफ तडवी, आरपीआयचे अरूण गजरे चर्चेत सहभागी झाले होते.१३ आॅगस्टपासून उपोषणदिड महिना होवूनही पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्याने १३ आॅगष्टपासून पिडीत महिलेसह तीन महिलांनी येथील पोलीस ठाण्यासमोर उपोषणास सुरवात केली होती . दरम्यान, या उपोषणार्थी महिलांची प्रकृती खालावली होती. तथापि त्यांनी उपचारार्थ दवाखान्यात दाखल होण्यास नकार दिल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी उपोषणस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. दरम्यान, रविवारी आमदार हरीभाऊ जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सातव्या दिवशी उपोषणाची सांगता झाली आहे.या प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्यासह आदिवासी बांधव व नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.तालुक्यातील मोहराळा येथील ४० वर्षीय विवाहितेचा पती अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना पोलीस ठाण्याचे इन्चार्ज सपोनि जयपाल हिरे यांनी विवाहितेच्या घरी जावून विनयभंग केल्याचा तिचा आरोप आहे. तसेच ही विवाहिता पतीचे औषध घेण्यासाठी यावलला आली असता येथील बुरूज चौकात शिपाई कदीर शेख यांनी सपोनि हिरे यांचाच निरोप घेवून आलो असल्याचे सांगत तिला गैरनिरोप दिला होता. यावरून पोलीस पत्नीने २४ जून रोजी येथील पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द तक्रार दिली होती. या तक्रारीवर पोलीस अधिकारी यांच्यामार्फत चौकशी झाली, मात्र ती चौकशी निष्पक्ष झाली नसल्याचा पिडीत महिलेचा आरोप आहे. 

टॅग्स :agitationआंदोलन