शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

‘मे हीट’चा तडाखा, उन्हामुळे केळी बागा करपत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:16 IST

हरताळा, ता.मुक्ताईनगर : हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी व वैशाखाच्या तीव्र उन्हामुळे अर्धवट सुकलेल्या केळीच्या बागा उपटून फेकण्यात येत आहेत. ...

हरताळा, ता.मुक्ताईनगर : हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी व वैशाखाच्या तीव्र उन्हामुळे अर्धवट सुकलेल्या केळीच्या बागा उपटून फेकण्यात येत आहेत. मे महिन्याच्या शेवटी आता काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असता, वैशाखाच्या वणव्यात भूजल पातळीही झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे संकट गंभीर बनत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतातील कूपनलिका बंद पडल्या आहेत. अतिशय कमी पाण्यावर केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.

येथील सुलोचना रत्नाकर कुलकर्णी नामक शेतकऱ्याने गटनंबर ४७४/१ मधील शेतात तीन हजार केळी खोड पाणी नसल्याने उपटून फेकले आहेत. वर्षभर केळीची निगा राखली. आता संपूर्ण खर्च वाया गेला आहे. एवढेच नव्हे, तर केळीबागा वाचविण्यासाठी नवीन दुसऱ्या ठिकाणावरील केळी वाचविण्याची धडपड सुरू आहे. यंदाच्या हंगामाचा खर्च वाया गेला आहे. पाणी कमी असल्याने केळीच्या बागा उपटून भेटण्याची वेळ आली आहे.

बागा वाचविण्यासाठी धडपड

अनेक ठिकाणी शेताच्या बांधावर चारही बाजूंनी केळी व बचावासाठी कपड्यांचा आडोसा करण्यात आला आहे. अपूर्ण पाण्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. लागलेला पैसा व व्यापाऱ्याकडून घेतलेला कर्जाचा पैसा परतफेड करणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी केळी मे हीटच्या उन्हाच्या तडाख्यामुळे आणि वादळाच्या भीतीमुळे यंदाही शेतकरी केळी लागवडीसाठी धजावत नव्हता. कूपनलिकाही अर्ध्यावरच बंद पडल्या आहेत. केळीच्या बागा सोडाव्या लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच केळ्यालाही पाहिजे तसा भाव नसल्याने, शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

केळी गुरांच्या पुढे

सध्या केळ्याला कमी भाव मिळत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे केळी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. केळ्याचा वापर गुरांचा चारा म्हणून उपयोगासाठी होत आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला, तरीही केळी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी अशा प्रकारे डझनभर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. काही शेतकऱ्यांनी ओझरखेडा येथील तलावातून स्वखर्चाने पाइपलाइन करून पाणी आणले आहे. मात्र, यंदा या ओझरखेडा तलावात हतनूर धरणाचे पुराचे पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यातही काही प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांच्या बागा धरून आहे, तर काहींकडे पाणी पातळी खोल गेल्याने व दुसरी कोणतीही सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने, केळी उपटून फेकण्याचे संकट शेतकऱ्यांवर येत आहे. यासाठी कायम सिंचनाची सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे.