शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे उत्पादन करून शेतकरी आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : एकीकडे शेती परवडत नाही, कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना, तालुक्यातील हिंगोणे खुर्द ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : एकीकडे शेती परवडत नाही, कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना, तालुक्यातील हिंगोणे खुर्द प्रगणे जळोद या लहानशा गावातील पदवीधर राजश्री पाटील या महिलेने शेती व्यवसायात प्रगती करून विक्रमी उत्पन्न घेतले. या व्यतिरिक्त अनुकूल वातावरण नसतानाही अनेक बियाण्याचे वाणही तयार करून स्वतःची कंपनी स्थापन करून कृषी क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे.

हिंगोणे खुर्द प्र. जळोद येथील राजश्री राजेश पाटील या पदवीधर असून, लग्नानंतर अवघ्या चार वर्षांत त्यांचे पती राजेश भाईदास पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला होता. वडिलोपार्जित ५५ एकर शेती होती. सासू शेती व्यवसाय बघायच्या. मात्र, स्वतःच्या दुःखातून सांभाळून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था लावून राजश्री पाटील यांनी शेतीबाबत अनभिज्ञ असूनही २०१७ साली शेती करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे, त्यांनी या व्यवसायात यशस्वी होण्याचा निश्चय करून, कृषीविषयी मासिके, कृषी प्रदर्शनमधून माहिती जाणून घेतली. त्यांनतर, त्यांनी १२ एकरवर ऊस लावला, २० एकरमध्ये सुबाभूळ लावला, तर उर्वरित जमिनीत कांदा, कपाशी, भाजीपाला घेणे सुरू केले.

आधी ऊसाचे उत्पन्न एकरी २० ते २१ टन यायचे, परंतु राजश्री पाटील यांनी कृषिभूषण संजीव माने यांच्या कार्यशाळेतून उत्पन्न वाढीव कसे घ्यावे, खत, पाणी व्यवस्थापन याचे मार्गदर्शन घेऊन, त्या पद्धतीने नियोजन केले व नंतर एकरी ४२ टन असे उत्पन्न घेऊ लागल्या. उसासाठी फारशी अनुकूल परिस्थिती नसताना उत्पन्न वाढवून एकरी ७० टन उत्पन्न घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

या व्यतिरिक्त त्या कांदा, दुधी भोपळा, वाल, कारले, मूग, भरीताचे वांगे असे उत्पादनही घेतात. जातीने लक्ष घालून आंतरमशागत, अभ्यासपूर्ण नियोजनामुळे पिकाची गुणवत्ता चांगली आली. त्यांनी शेतकऱ्यांना स्वस्तात उत्कृष्ट बियाणे देण्याचा निर्णय घेतला.

कांदा म्हटला की, लासलगाव, पिंपळगाव, उमराने, नाशिक या भागात भरघोस पीक आणि विविध प्रकारचे बियाणे मिळते. मात्र, राजश्री पाटील यांनी बियाणे निर्मिती सुरू केली. कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगरच्या संकेतस्थळावर भेट देऊन कृषी मासिक येथून माहिती घेऊन राहुरी कृषी विद्यापीठ, जिल्हा बीज प्रमाणीकरणाकडे नोंदणी केली. फुले समर्थ व दमोता फुरसुंगी या उत्कृष्ट कांदा बियाण्याचे उत्पादन करून, परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी स्वस्तात बियाणे उपलब्ध केले.

दमोता सिड्स कंपनी स्थापन करून, त्या माध्यमातून कांदा फुले समर्थ, गहू फुले समाधान, बाजरी धनशक्ती, भोपळा सम्राट, वाल फुले गौरी, कारले फुले ग्रीन गोल्ड यांच्या बियाण्यांचे उत्पादन केले व संशोधित भाजीपाला वाणाचे काम सुरू आहे. पाण्याचा नियोजनबद्ध वापर, जमिनीची सुपीकता टिकवून सेंद्रिय खतांचा वापर करून, महिला असूनही राजश्री पाटील शेती व्यवसायात यशस्वी झाल्या आहेत. शेतकऱ्यांना वाजवी भावात चांगली व उत्कृष्ट बियाणे मिळाल्यास उत्पन्न चांगले येते. परिणामी, शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी त्यांनी विविध वाणाचे बीजोत्पादन करून कृषी व्यवसायात यशस्वी होऊन महिलांपुढे आदर्श घालून दिला आहे.

शेती सांभाळून त्यांनी सरपंच म्हणून गावचा कारभारही सांभाळणे सुरू केले आहे. त्या आमदार अनिल पाटील यांच्या भावजयी आहेत.

===Photopath===

300621\30jal_1_30062021_12.jpg~300621\30jal_2_30062021_12.jpg

===Caption===

सुशिक्षित पदवीधर असूनही सासूच्या मार्गदर्शनाने स्वतः शेतीत राबून विविध बियाण्यांच्या उत्पादन करणाऱ्या राजश्री पाटील. (छाया :अंबिका फोटो)~सुशिक्षित पदवीधर असूनही सासूच्या मार्गदर्शनाने स्वतः शेतीत राबून विविध बियाण्यांच्या उत्पादन करणाऱ्या राजश्री पाटील. (छाया :अंबिका फोटो)