शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

टोल नाक्यावरून वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव/ नशिराबाद : चिखली ते तरसोद या दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव/ नशिराबाद : चिखली ते तरसोद या दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर नशिराबादच्या पुढे टोल नाका सुरू करण्यात आला. मात्र, या टोल वसुलीला नागरिकांनी विरोध केला आहे. कामे अपूर्ण असताना टोल नाका कसा? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. तसेच न्यायालयात धाव घेण्याचा इशारादेखील देण्यात आला. नागरिकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील टोल नाक्याला विरोध केला आहे.

चिखली ते तरसोद असे चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. हे काम जलदगतीने व निकषानुसार करण्यात येत आहे. मात्र, तरसोद ते फागणेदरम्यानचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, महामार्गावर अनेक बाबींच्या त्रुटी कायम आहेत. त्या आधी दूर कराव्यात, अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. तसेच त्याचे निवेदन देण्यात आले आहे.

तरसोद ते चिखली दरम्यानचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन ते तीन महिने लागू शकतात. या मार्गावर काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. ही कामे पूर्ण न करता टोल सुरू झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारादेखील पंकज महाजन यांनी दिला.

पहिल्या दिवशी वाद

टोलनाका सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी त्याला विरोध केला. बहुतेकांना येथे टोलनाका बुधवारपासून सुरू झाल्याचे माहीत नव्हते. त्यामुळे वाद वाढले. या रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यातच अनेक वाहनधारकांकडे फास्टटॅग नसल्याने त्यांना दुप्पट दंड लागत होता. काहींनी मासिक पास मिळावा यासाठी देखील गर्दी केली होती. या टोल नाक्यावर २५० रुपये मासिक पास लागू करण्यात आला आहे.

स्थानिकांना नोकरी द्या

या टोलनाक्यावर स्थानिकांना नोकरी मिळावी यासाठी अनेक जण आग्रही आहेत. या टोलनाक्यावर बुधवारी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नोकरी मिळावी यासाठी पोहोचले होते. त्यामुळे आणखीच गोंधळ उडत होता. एक ते दोन दिवसांत या सर्व बाबींचा निपटारा केला जाईल, अशी माहिती टोल नाका संचालन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक शहाबल खान यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव ते भुसावळ या दरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तरी सद्यस्थितीत टोल नाका सुरू करू नये. प्रवासी वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यामुळे जनतेला भुर्दंड नको, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केली आहे. रवींद्र पाटील यांनी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले आहे.