शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

अमळनेर येथे मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीबाबत ठेवली झाकली मूठ सव्वा लाखाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 3:31 PM

चौधरी व वाघ यांना आशीर्वाद आहेत का ? जनतेला विचारला सवाल

अमळनेर : निम्न तापी प्रकल्पाला १५०० कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे या भागात सिंचन वाढून शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे सांगत तुमचा जनादेश घ्यायला आलो आहे, तुमचा जनादेश आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागत सभेत केला. जनतेनेही मोठ्या आवाजात प्रतिसाद दिलादुपारी दीड वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा अमळनेरात पोहचली. येथील फरशी पुलावर रमाबाई आंबेडकर चौकात सभेला सुरुवात झाली. वाहनावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी होते. रस्ते, जलयुक्त शिवार आदी कामांचा उल्लेख त्यांनी केला.झाकली मूठ सव्वा लाखाची...जनतेला आवाहन करताना आमदार शिरीष चौधरी व स्मिता वाघ यांना तुमचा आशीर्वाद आहे का, असा सवाल करीत विधानसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली. मुख्यमंत्री शिरीष चौधरींना जवळ करतात की स्मिता वाघ यांना, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले होते.मुख्यमंत्र्यांचे पैलाड भागात आगमन झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात तसेच कळमसरे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम मंडळाने स्वागत केले. यावेळी पूरग्रस्तांसाठी अमळनेर टॅक्सी युनियन पदाधिकारी, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, भाजपच्या कविता जाधव यांनी मुख्यमंत्री निधीला मदत केली.यावेळी व्यसपीठावर उदय वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, पंचायत समिती सभापती वजाताई भिल, बाजार समिती सभापती प्रफुल पवार, जिल्हा परिषद सदस्या मीना पाटील, संगीता भिल, माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील, माधुरी पाटील, शहराध्यक्ष शीतल देशमुख, भिकेश पाटील, महेश पाटील, महेंद्र बोरसे, रामभाऊ संदनशिव उपस्थित होते.आणि साहेबरावांना विचारला सवाल...तुमचा जनादेश आहे का, असे आवाहन जनतेला करत असताना गिरीश महाजनांनी फडणवीस यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यावर लागलीच त्यांनी स्मित हास्य करीत तुमचा जनादेश आहे का, असे साहेबरावांना जाहीरपणे विचारले. त्यावर त्यांनीही हसत होकार दिला.पक्षातील गटबाजीचे दर्शनयावेळी भाजपमध्ये गटबाजी असल्याचे स्पष्टपणे उघड झाले. उदय वाघ, पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील, माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांचे वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावण्याची जणू स्पर्धाच लागली होती. तर माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांचा स्वतंत्र गट पैलाड भागात स्वागताला उभा होता. त्यावेळी ठाकूर समाजाने त्यांना मागण्यांचे निवेदन दिले, पाडळसरे जनआंदोलन समितीने १५०० कोटी दिल्याबद्दल आभार मानले.