शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

डीबीटी योजनेच्या विरोधात यावल येथे आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:05 IST

डीबीटी योजनेच्या विरोधात जिल्ह्यातील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर सोमवारी धडक मारत भरपावसात ठिय्या आंदोलन मांडले असून घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरातून पाचशेच्यावर विद्यार्थी एकवटलेसायंकाळपर्यंत आंदोलनस्थळी येणे सुरूचपाऊस असतांनाही आंदोलनस्थळ सोडले नाही.

आॅनलाईन लोकमतयावल, दि.६ : आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या खानावळीतूनच आहार देण्याऐवजी विद्यार्थ्याच्या खात्यावर थेट आहाराचे अनुदान (डीबीटी योजना) देण्याबाबात शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात (राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत ) तसेच अन्य १५ शैक्षणिक मागण्यासाठी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हयातील आदिवासी विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर सोमवारी धडक देत सकाळी अकरा वाजेपासून ठिय्या आंदोलन सुरू करीत शासनाच्या या योजनेला जोरदार विरोध केला आहे. भरपावसात ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी शासन विरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. जिल्हाभरातून सुमारे ५०० विद्यार्थी येथे धडकले असून सायंकाळपर्यंत विद्यार्थी येणे सुरूच होते. विशेष म्हणजे आंदोलकांमध्ये विद्यार्थींनींचा मोठया प्रमाणात समावेश होता.राज्यातील आदिवासी विद्यार्थी वसतीगृहात गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटदारामार्फत विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते. त्या एैवजी आता भोजन अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करून त्यांनी स्वत: परस्पर जेवणाची व्यवस्था करावी अशी ही शासनाची डीबीटी योजना आहे. शासनाने ही योजना राबविण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. या योजनेस जिल्हयातील आदिवासी विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा मोठा विरोध आहे. त्यासाठी जिल्हयातील जळगाव, अमळनेर, चोपडा येथील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी यावल येथे सोमवारी येवून आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. चार तासांपासून विद्यार्थ्यांनी शासन विरोधी व प्रकल्प कार्यालयाविरोधी घोषणा देत परिसर दणाणून टाकला होता. नंतर आपल्या मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांना देण्यात आले. निवेदनामध्ये चोपडा वसतीगृहाचा वाढीव कोटा मंजूर करावा, डी. बी. टी. योजना तात्काळ रद्द करावी, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. यावेळी आंदोलन समितीचे जिल्हा प्रमुख होमा वसावे, तुषार पवार, अ‍ॅड़ जुम्मासिंग बारेला, भारती पराडके या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. फौजदार सुनिता कोळपकर व सहका-यांनी बंदोबसत ठेवला.दरम्यान, दुपारी साडे चार वाजेपर्यंत या आंदोलनासंदर्भात कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते. आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून अधिकारी कार्यालयात होते तर बाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या सुरू होता. 

टॅग्स :agitationआंदोलन