शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वाढते अपघात रोखण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’- पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे

By admin | Updated: June 13, 2017 10:52 IST

सायबर गुन्ह्यांबाबत जिल्हाभरात करणार जनजागृती

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.13 : जिल्ह्यात दररोज 5 ते 6 अपघात होतात व त्यात किमान एका व्यक्तीचा  जीव जातो. वाढते अपघात ही चिंताजनक बाब असून ते रोखण्यासाठी पोलीस, आरटीओ व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आराखडा तयार केला जात आहे. सायबर गुन्ह्यांचेही प्रमाण वाढले आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्याची मदत घेवून शाळा, महाविद्यालय व सोसायटय़ांमध्ये मोबाईल व लॅपटॉप हाताळण्याबाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी  दिली. 
कराळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सोमवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी त्यांचे स्वागत केले. कराळे यांच्याशी झालेली चर्चा प्रश्नोत्तर स्वरुपात अशी..
प्रश्न : पोलीस अधीक्षक म्हणून आपण कोणत्या विषयाला प्राधान्य देणार?
कराळे : जळगाव जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर अपघाताच्या घटनांनी मन सुन्न झाले.  दिवसाला 5 ते 6 अपघात होतात व त्यात किमान एक बळी जातो. त्यामुळे अपघात रोखणे यालाच प्रथम प्राधान्य दिले आहे.ज्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपघात झाले आहेत अशा ठिकाणांचे पोलीस, आरटीओ व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्रित सव्र्हेक्षण केले जाणार आहे.
प्रश्न : जिल्ह्यातील वाढते अपघात कसे रोखणार?
कराळे : तिन्ही यंत्रणाच्या अहवालावर उपाययोजना केल्या जातील. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विनय मोरे यांना जळगावात बोलावले जाणार आहे. मोरे यांचा अपघाताच्या बाबतील गाढा अभ्यास आहे. अपघात कसे होतात, ते रोखण्यासाठी काय केले पाहिजे, अपघातात जीव कसे वाचविता येवू शकतात याबाबत ते शाळा, महाविद्यालयात जावून सादरीकरण करतील. त्यामुळे 20 टक्के अपघात रोखता आले तरी हेतू साध्य होईल. 
प्रश्न : सायबरचे गुन्हे रोखण्यासाठी काय उपायोजना करणार?
कराळे : सायबरचे गुन्हे रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय, कार्पोरेट कार्यालय, कंपन्या व सोसायटींमध्ये जावून मोबाईल व लॅपटॉप वापरावर जनजागृती केली जाईल. अभिया¨त्रकीच्या विद्याथ्र्याची यात मदत घेतली जाईल. त्याला काय प्रतिसाद मिळाला त्यानंतर पुढची दिशा ठरविली जाईल. सूचनांचेही आम्ही स्वागत करु.
महिलांवरील अन्याय व अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत प्रबोधन करणार
 महिलांवरील अन्याय व अत्याचाराचे गुन्हे तसेच अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आहे. काही गुन्हे सूड भावनेतून दाखल होत असल्याचेही लक्षात आले आहे. 
महिला व मुलींच्या या गुन्ह्यांबाबत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेवून समाजात परिवर्तन केले जाईल, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले.
प्रश्न : जिल्हा पोलीस दलात मनुष्यबळाची अडचण आहे का?
कराळे : शंभराच्या जवळपास जागा रिक्त आहेत. भरतीतून काही जागा भरल्या जातील. महिलांचे प्रमाण कमी असल्याने या गॅङोटमध्ये मोठय़ा पोलीस स्टेशनला 7, तालुकास्तरावर 5 व लहान पोलीस स्टेशनला 3 महिला कर्मचारी दिलेल्या आहेत. शिवाय लहान पोलीस स्टेशनला 30 कर्मचारी देण्यात आले आहेत.