शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षांत वन विभागाला व्याघ्र कॉरिडॉरसाठी प्रस्तावही तयार करता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:12 IST

जिल्ह्यातील वाघ वन विभागाने सोडले वाऱ्यावर : बैठकांचा नुसता फार्स : मेळघाट ते अनेरपर्यंतचा कॉरिडॉरचा प्रस्ताव धूळ खात; वन ...

जिल्ह्यातील वाघ वन विभागाने सोडले वाऱ्यावर : बैठकांचा नुसता फार्स : मेळघाट ते अनेरपर्यंतचा कॉरिडॉरचा प्रस्ताव धूळ खात; वन विभागाची अनास्था

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील पाल अभयारण्यात काही दिवसांपूर्वी पट्टेदार वाघाचे दर्शन झाले असून, याआधी देखील वढोदा वनक्षेत्रात व लंगडा आंबा परिसरात वाघाचे दर्शन झाले आहे. जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व वेळोवेळी सिध्द होत असताना देखील वन विभागाकडून वाघांच्या संवर्धनासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसून येत नाही.

९ वर्षांपासून मेळघाट ते मुक्ताई-भवानी वनक्षेत्र ते अनेरपर्यंत व्याघ्र कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा झाली आहे. मात्र, वन विभागाच्या उदासीन धोरणामुळे हे काम थांबले असून, वन विभागाला साधा डीपीआर देखील तयार करता आलेला नाही. वन विभागाच्या या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील वाघ वाऱ्यावर सोडले गेले आहेत.

जळगाव वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या १५ हजार जंगल क्षेत्रातील मुक्ताईनगर तालुक्यात वढोदा, चारठाणा, डोलारखेडा भागात १२ वाघांचा वावर होता. मात्र आता या भागात केवळ ४ ते ५ वाघ उरले आहेत, तर काही वाघ हे नियमित संचार करत असतात. या भागातही वाघ जगवायचे असतील, तर यावल, अनेर डॅम अभयारण्य क्षेत्रात व्याघ्र प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव २०१३ मध्ये जळगाव वन विभाग व सातपुडा बचाव समितीने तयार करून अंतिम मान्यतेसाठी नाशिक वन्यजीव विभागाकडे पाठवला होता. मात्र, सात वर्षांपासून हा प्रस्ताव धूळ खात पडल्यानंतर नाशिक वन विभागाने देखील यावर कोणताही निर्णय घेतला नाही.

समितीच्या बैठका सुरूच, प्रस्ताव मात्र नाही

दीड वर्षापूर्वी या कॉरिडॉरसाठी वन विभागाची बैठक झाली होती. या बैठकीत पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तसेच प्रस्ताव तयार करण्यासाठी दहा जणांची समिती देखील तयार करण्यात आली होती. मात्र, वन विभागाकडून अद्यापही प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. मात्र, अनेकवेळा केवळ बैठकाच सुरू असून, तोडगा मात्र काढता आलेला नाही. मेळघाट - अनेरदरम्यानच्या व्याघ्र कॉरिडॉरबाबत २०१३ पासून हा प्रस्ताव पडून होता. त्यानंतर नव्याने समिती गठित झाल्यानंतर या प्रस्तावाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, वन विभाग याबाबत गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही.

जेव्हा वाघांचे अस्तित्व नाहीसे होणार, तेव्हा कॉरिडॉर होणार का ?

मुक्ताई-भवानी परिसरात ८ वाघ असल्याची शक्यता वन विभागाकडून वर्तविण्यात येते. मात्र, या भागात वेडी बाभूळ या वनस्पतीची वाढत जाणारी संख्या यामुळे हरिण, नीलगाय या तृणभक्ष्यी प्राण्यांची संख्या या भागातून कमी होत आहे. त्यामुळे या भागातील वाघ देखील विस्थापित होत आहेत. अनेकदा या भागातील वाघ शिकारीच्या शोधात केळीच्या बागांमध्ये पोहोचला होता. त्यामुळे गवताच्या कुरणाचे क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. नीलगाय व हरणांची संख्या वाढवून वाघांच्या शिकारीला पोषक वातावरण उपलब्ध करणे गरजेचे आहे. तसेच मेळघाट व मुक्ताई-भवानीदरम्यानचा बफरझोन तयार करून, वाघांचा संचार मार्ग होणे गरजेचे आहे. मात्र, वन विभागाच्या सध्या दिसून येणाऱ्या उदासीन धोरणामुळे जेव्हा या भागातील वाघांचे अस्तित्व पूर्णपणे नाहीसे होईल, तरीही वन विभागाला जाग येणार नाही असेच दिसून येते.

मंजुरी मिळाली आहे, मात्र प्रस्तावच नाही

मेळघाट ते अनेर डॅमपर्यंत सुमारे २३४ कि.मी.च्या कॉरिडॉरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गेल्यावर्षी राज्याचे तत्कालीन वन्यजीवचे अप्पर मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी मुक्ताईनगरातील मुक्ताई-भवानी व डोलारखेडा भागात जाऊन संचारमार्गाची पाहणी केली होती. या कॉरिडॉरमध्ये ६२ हजार ८३९ हेक्टर जंगलाचे क्षेत्र येणार आहे. तसेच याबाबत लिमये यांनी वन विभागाला याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, वन विभागाने प्रस्तावच तयार करून दिलेला नाही.

कोट..

वाघांचा बचाव करण्यासाठी वाघांचे संचारमार्ग कायम ठेवणे गरजेचे आहे. मेळघाट ते अनेक डॅमपर्यंत वाघांच्या संचारमार्गासाठी कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव २०१३ मध्ये देण्यात आला होता. आता नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात ८ पेक्षा अधिक वाघ आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी शासनासह वन विभागाने देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- अभय उजागरे, सदस्य, जैवविविधता समिती, जळगाव