शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

६५ हजार शेतकरी राहणार पीक विम्याच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:46 IST

नुकसानीबाबत मुदतीत तक्रार नाही: अजूनही आॅनलाईन तक्रार पाठविण्याची बळीराजाला संधी

जळगाव : प्रधानमंत्री फसल विमा योजनेत खरीप हंगामात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकऱ्यांपैकी केवळ ३६ हजार ३८७ शेतकऱ्यांनीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार नियमानुसार ४८ तासांच्या आत कंपनीकडे दिली आहे.त्यामुळे उर्वरीत ६५ हजार १६ शेतकरी पीकविम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचीत राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या शेतकºयांना तक्रार करण्याची आणखी एक संधी असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.प्रधानमंत्री फसल विमा योजना २०१९ मध्ये खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकरी सहभागी झाले होते.त्यासाठी त्यांनी स्वत: १८ कोटी ८८ लाख ३१ हजार १८२ रूपये तर उर्वरीत हिस्सा केंद्र व राज्य शासनाने भरला होता.त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख १२ हजार १२६ हेक्टरचा ३९३ कोटी ७१ लाख ३८ हजार ५१९ रूपयांचा विमा उतरविण्यात आला होता.केवळ ३६ हजार ३८७ शेतकºयांकडून तक्रारजिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास विमा धारकांनी ४८ तासांच्या आत त्याबाबत तालुका कृषी अधिकाºयांकडे लेखी अथवा विमा कंपनीकडे ई-मेलवर तक्रार करणे बंधनकारक असते. त्यानुसार केवळ ३६ हजार ३८७ शेतकºयांनीच तक्रार केली आहे. त्यामुळे उर्वरित ६५ हजार १६ शेतकरी विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यांना शासना५उ४ी नुकसान भरपाईचा लाभ मात्र मिळू शकेल. दरम्यान गुरूवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उर्वरीत शेतकºयांना नुकसानीची तक्रार देण्याची आणखी एक संधी असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.तालुकानिहाय विमाधारक शेतकरीजळगाव - १९९७भुसावळ - ५३१बोदवड - १९३८यावल - १८८१रावेर - १०८६मुक्ताईनगर- २१४१अमळनेर - २८३६२चोपडा - ८३७७एरंडोल - ३४९२धरणगाव - ६४६६पारोळा - १३२४९चाळीसगाव- ६३५४जामनेर - १८३३३पाचोरा - ४११३भडगाव - ३०८३

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव