शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

यंदा सामुदायिक विवाह सोहळ्याचा मुहूर्त हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:48 AM

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह सामुदायिक पध्दतीने लावून त्यांना आधार देण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयातर्फे विशेष उपक्रम राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त एस. जी. डिघे यांनी राबविला होता. मात्र, त्यांच्या या उपक्रमास जिल्ह्यात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह सामुदायिक पध्दतीने लावून त्यांना आधार देण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयातर्फे विशेष उपक्रम राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त एस. जी. डिघे यांनी राबविला होता. मात्र, त्यांच्या या उपक्रमास जिल्ह्यात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही.राज्यातील विविध मंदिरांकडे मोठ्या प्रमाणावर रोख स्वरूपात देणगी येते. त्यातील काही हिस्सा हा त्यांनी विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी द्यावा असे आवाहन डीघे यांनी केले होते. त्यानुसार येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अशा प्रकारचा सोहळा यशस्वी करण्यासाठी एका समितीची स्थापना माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली केली होती, त्यात १९ जणांचा समावेश होता. या समितीने शैक्षणिक तसेच मंदिराच्या विश्वस्तांच्या बैठका घेऊन या विवाहसोहळ्यासाठी गावापातळीवर संपर्क करून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलींचा शोध घेण्यासह निधी संकलनासाठी प्रयत्न केले. त्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयास कळवले. तसेच यासाठी साडेचार लाख रूपयांचा निधी जमा झाला होता तर विवाहासाठी केवळ दोन जणांची तयारी असल्याने हा विवाह सोहळा सामुदायिक होत नसल्याने, या दोन जोडप्यांना औरंगाबाद येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात पाठवून त्यांचे लग्न लावून देण्यात आले. एकूणच राजकीय हेवेदावे तसेच उत्पन्न असणा-या देवस्थानांकडूनही यासाठी हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने एका चांगल्या उपक्रमाला पहिल्याच वर्षी अल्प प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Socialसामाजिकmarriageलग्न