शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ग्रामस्थांची ‘जार’च्या पाण्यावर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:40 AM

गावात नळाला पाणी येण्यासाठी महिना- दीड महिना लागत असल्याने आता १८ हजार टेंभुर्णीकरांना केवळ ‘जार’ च्या पाण्याचा आधार उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : १८ हजार लोकसंख्येच्या टेंभुर्णी गावाला मागील पाच महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात नळाला पाणी येण्यासाठी महिना- दीड महिना लागत असल्याने आता १८ हजार टेंभुर्णीकरांना केवळ ‘जार’ च्या पाण्याचा आधार उरला आहे. वापरायला टँकर आणि प्यायला जार... अन् पाणीटंचाईने ग्रामस्थ झाले बेजार असे म्हणण्याची वेळ सध्या गावकऱ्यांवर आली आहे.टेंभुर्णीचा पाणीप्रश्न या ना त्या कारणाने नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. टेंभुर्णीला पाणीपुरवठा करणा-या अकोला देव येथील जीवरेखा धरणात सध्या पाणीसाठा उपलब्ध असतानाही लोडशेडिंग, पाईपलाईन गळती, जनरेटर इंधनखर्च असमर्थता, टॅकर नामंजूर अशा अनेक कारणामुळे टेंभुर्णीकर सदैव तहानलेलेच राहिले आहे.गावातील प्रत्येक झोनला नळाचे पाणी एकदा येण्यासाठी ग्रामस्थांना जवळपास दिड महिना वाट पाहावी लागत आहे.अशा भीषण अवस्थेत ५ रूपयात २० लीटर पाणी देणारे ग्रामपंचायतचे फिल्टर प्लँट सध्या बंद पडल्याने संपूर्ण गावाची दारोमदार तीन खाजगी फिल्टर प्लंटवरच आहे. या ३ प्लंटवर मिळून दररोज जवळपास १८ हजार लीटर पाण्याची विक्री होत आहे. एरवी १० रूपयात भरून मिळणारे हे जार आता जागेवर १५ रूपयाला भरून मिळत आहे.याशिवाय वापरण्यासाठी ट्रँकरच्या पाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ट्रँकरलाही जवळ पाणीसाठा नसल्याने ट्रँकरचे भाव ही ६०० ते ७०० च्या घरात जावून पोहचले आहे. सामान्य जनतेने ऐन दुष्काळात पाण्यासाठी एवढी रक्कम आणावी कुठून असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळWaterपाणी