शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 13:23 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास साडेपाच लाख शेतकऱ्यांनी 3 लाख 59 हजार 992 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे.

गोरख देवकरअहमदनगर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास साडेपाच लाख शेतकऱ्यांनी 3 लाख 59 हजार 992 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे. तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविली होती. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दीडपट अधिक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे.प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 5 लाख 68 हजार 375 शेतक-यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीक विमा उतरविला आहे. विमाहप्त्यापोटी 22 कोटी 82 लाख रूपये भरले आहेत. गतवर्षी साडेतीन लाख शेतक-यांनी पीक विमा भरला होता़ त्या तुलनेत यंदा शेतक-यांची दीडपट अधिक संख्या आहे.जिल्ह्यात यंदा भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोटात पाऊस आहे. मात्र लाभक्षेत्रात पावसाने दांडी मारली आहे. बहुतांश भागात पेरलेले अद्यापपर्यंत उगवलेले नाही.2014-151 लाख 40 हजार 154 शेतक-यांनी 3 कोटी 92 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. त्यांना 22.07 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.2015-163 लाख 77 हजार 217 शेतक-यांनी 10 कोटी 57 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. शेतक-यांना 120.62 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.2016-174 लाख 29 हजार 150 शेतक-यांनी 21 कोटी 53 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. शेतक-यांना 83.23 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.2017-182 लाख 52 हजार 896 शेतक-यांनी 22 कोटी 4 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. केवळ 20.87 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.2018-197 लाख 65 हजार 505 शेतक-यांनी 47 कोटी 9 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. शेतक-यांना 90.79 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतक-यांना विमा संरक्षण मिळणार.24 जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम मुदत होती. पण, यासाठी येणा-या तांत्रिक अडचणी, पोर्टलमध्ये वारंवार उद्भवणा-या त्रुटी आणि बँकानी पीक विमा भरून घेण्यास होत असलेला विलंब यामुळे सेतु सुविधा केंद्रावर होणारी शेतक-यांची गर्दी लक्षात घेऊन 31 जुलैपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली.विमा हप्ता किती?खरीप हंगामातील पिकांसाठी शेतक-यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के तर नगदी पिकांकरिता 5 टक्के हप्ता शेतक-यांना भरावा लागणार आहे.5.68 लाख शेतक-यांनी यंदा जिल्ह्यातील 3 लाख 59 हजार 692 हेक्टरवरील विविध पिकांचा विमा उतरविला

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय