शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने झोडपले; वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 17:29 IST

rain in Jalana : कपाशी , सोयाबीन , तूर ,बाजरी या पिकांसह मोसंबी आणि डाळिंब अशी फळपिकेही धोक्यात आली आहेत.

ठळक मुद्देगोंदी, वडीगोद्री, सुखापुरी शिवाराला पावसाने झोडपलेअंबड तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे 

अंबड ( जालना ) :  तालुक्यातील  गोंदी , वडीगोद्री , सुखापुरी मंडळात सोमवारी पावसाने पुन्हा झोडपून काढले. तालुक्यातील अनेक  गावांत पिके पाण्यात गेली आहेत. गोदावरी व इतर नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी संपर्क  तुटलेला आहे.

तालुक्यात मागील आठवडाभरापासून पाऊस  ठाण मांडून आहे. दरम्यान, सोमवारी व मंगळवारी पहाटेच   शिवारात जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसाने शेतात खरीप पिके  पाण्यात गेली आहेत. तालुक्यात  गोदावरी नदी, गल्हाटी नदीला पूर आला आहे. मंगला , लेंडी नदी, चांदसुरा नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. वडीगोद्री मंडळात 133 मिमी तर गोंदी मंडळात 160 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गल्‍हाटी नदीला पूर आल्‍याने आधीच्या पूर परिस्थितीने त्रस्त झालेल्या पिठोरी सिरसगाव, घुंगर्डे हादगाव येथील ग्रामस्थांचे पुन्हा पूर  स्थितीमुळे जीवन विस्कळीत झाले आहे. महसूल प्रशासनाने  तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.  महागडी बियाणे, खते व औषधींचा खर्च करून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. कपाशी , सोयाबीन , तूर ,बाजरी या पिकांसह मोसंबी आणि डाळिंब अशी फळपिकेही धोक्यात आली आहेत.

Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण

जायकवाडी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या आणि आरक्षित पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. नदी-नाले ओसांडून भरले असून अनेक गावांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. जोरदार पावसाने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत  मोठी वाढ झाली आहे. एकूणच अतिपावसाने पिके पिवळी पडून करपत आहेत. - जोरदार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने या भागात वस्तुनिष्ठ पीक पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली

दि. 28 सप्टेंबर रोजी  सकाळी आठ वाजेपर्यंत अंबड तालुक्यातील सात महसुल मंडळात खालीलप्रमाणे पाऊस (मी.मी.) पडला आहे.गोंदी 160,वडीगोद्री -133 ,रोहिलागड -  45 ,,सुखापुरी 164 , धनगर पिंप्री 90 , अंबड - 77 ,जामखेड - 40  मिमी पावसाची नोंद झाली.बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे. 

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाagricultureशेती