शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

जालना शहरात १०० खाटांचे रूग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:20 PM

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जालना शहरातील शासकीय रूग्णालयासमोरील इमारतीत १०० खाटांचे आयसीयू रूग्णालय होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यात मात्र अद्याप एकही रूग्ण आढळून आला नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जालना शहरातील शासकीय रूग्णालयासमोरील इमारतीत १०० खाटांचे आयसीयू रूग्णालय होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली.जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशातही वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सहाशेच्यावर गेला. राज्यातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रूग्ण सापडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहे.जिल्ह्यात ९८८ गावे असून, ७७९ ग्रामपंचायती आहे. गावात बाहेरगावाहून आलेले नागरिक प्रशासनास माहिती देत नसल्याने १९३० आरोग्य सेविका, १४७० आशा वर्कर्समार्फेत गावांमधील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात आहे. जवळपास ५ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजार ५१ कुटुंबांचे सर्वेक्षण झाले असून ८ हजार १४० लोक बाहेरगावाहून आल्याचे आढळून आले. तर १८०७ लोकांना ताप, खोकला व सर्दी असल्याचे दिसून आले. त्यांची आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले.सर्दी, ताप, खोकला असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी २१७ पथकांची नियुक्ती करण्यात आली. हे पथक संशयितांच्या तपासणीबरोबरच जनजागृती करीत आहे. आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण भागात आतापर्यंत ७ लाख पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आरोग्य विभागातील रिक्तपदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. जिल्ह्यात ४१ आरोग्य केंदे्र आहे. त्यात जवळपास २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासह आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, इतर कर्मचा-यांची बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना करताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.दरम्यान, जिल्ह्यात ४० रुग्णवाहिकांपैकी १०८ च्या १४ रुग्णवाहिका आहे. १०८ रुग्णवाहिकेतून संशयितांना शासकीय रुग्णालयात आणण्यात येते. आरोग्य केंद्रावर प्रत्यक्ष भेटी दिल्या असता, सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी केंद्रात आढळून आल्याचे खतगावकर यांनी सांगितले.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य विभागातर्फे हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला असून, १८ मार्चपासून या क्रमांकावर केवळ ५ कॉल आले आहेत.ग्रामीण भागात जनजागृतीकोरोना आजारावर अद्यापही औषध निघाले नाही. या आजारावर मात करण्यासाठी सॅनिटायझरने वेळोवेळी हात धूणे, बाहेर न निघणे हे उपाय आहेत. याबाबत ग्रामीण भागातील रूग्णांमध्ये जागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभागाने जिल्हाभरात ७७ ठिकाणी होर्डिंग, ५००० बॅर्नर, ७ लाख पॉम्पलेट वाटप केले.आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. त्यामुळे येणा-या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास खाजगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांनी नुकतीच खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली असून, सर्व डॉक्टरांनी उपचार करण्यास होकार दिला आहे.१५३९ खाटांची व्यवस्था : परदेशातून आले ८८ नागरिकपरदेशातून जिल्ह्यात आतापर्यंत ८८ नागरिक आले. तपासणी करून त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले. दर दोन दिवसांनी त्यांची तपासणी केली जाते. परदेशातून आलेल्यांनी बाहेर फिरू नये, असे आवाहन करण्यात आले. विलगीकरण कक्षासाठी जिल्हाभरातील १५ शाळा व महाविद्यालयांसह वसतीगृहही ताब्यात घेण्यात आले. यामध्ये १५३९ खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयHealthआरोग्य