शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

राजुरेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची पायी वारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:54 AM

मंगळवारी अंगारिका चतुर्थी असल्याने राजूरेश्वराच्या दर्शनाला मोठे महत्व भाविकांमध्ये फार पूर्वीपासून आहे. आपल्या दैवताच्या दर्शनासाठी हजारो भाविक हे जालन्यातून पायीवारी करतात

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या मराठवाड्यात पावसाने हुलकावणी दिली आहे, असे असले तरी परतीचा पाऊस पडेल अशी ओढ मनात ठेवून, राजूरेश्वरला पावसाचे साकडे घालण्यासाठी आम्ही जात असल्याचे वारकऱ्यांच्या एका जथ्थ्याने सांगितले. हा भाविकांचा जथ्था परभणी जिल्ह्यातून राजूरच्या दर्शनासाठी जालन्यातून पायवारीव्दारे जात होता. मंगळवारी अंगारिका चतुर्थी असल्याने राजूरेश्वराच्या दर्शनाला मोठे महत्व भाविकांमध्ये फार पूर्वीपासून आहे. आपल्या दैवताच्या दर्शनासाठी हजारो भाविक हे जालन्यातून पायीवारी करतात. तसेच भोकरदन आणि अन्य शहरातूनही अनेकजण पायी जातात.राजूरेश्वराचे महत्व हे पौराणिक कथांमध्ये विशद केलेले आहे. गणपतीच्या शक्तीपीठांपैकी राजूरेश्वरला नाभिचे स्थान मानले जाते. या गणपतीचे ऐतिहासिक पौराणिक महत्व सर्वजण जाणून असल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणूनही याची ओळख संर्पूण महाराष्ट्रभर आहे. अंगारिका चतुर्थीला राजूरेश्वराच्या दर्शनाला येणाºया भाविकांची लाखोतील संख्या लक्षात घेऊन प्रशासनो आवश्यक ती तयारी केली आहे. मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात.दर्शनासाठी पायी जाणा-या भाविकांची हजारोंची संख्या लक्षात घेऊन वाहतूकीतही मोठे बदल केले असून, पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. राजूर मंदिर परिसरात दर्शन शांततेत व्हावे म्हणून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्हीची नजरही या सर्व यात्रेवर राहणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.पंढरपूरच्या यात्रेत ज्या प्रमाणे रांगेतील वारकाऱ्यांमधून एका जोडप्याला विठ्ठलाच्या पूजेचा सन्मान मिळतो. तशीच पद्धत राजूरमध्येही गेल्या काही वर्षात सुरू करण्यात आली आहे. त्याामुळे आपल्याला हा सन्मान मिळावा म्हणून अनेकजण रात्री नऊ वाजेपासूनच रांगेत दर्शनासाठी उभे राहतात असे सांगण्यात आले.या पायी जाणा-या भाविकांना विविध संस्थां, संघटनांकडून जागोजागी चहापान तसेच फराळाची व्यवस्था केली आहे.अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्थाही अनेक ठिकाणी करण्यात आली आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम