अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती

By शिवाजी कदम | Published: January 9, 2024 02:31 PM2024-01-09T14:31:51+5:302024-01-09T14:34:20+5:30

मासेमारी व्यवसाय अडचणीत आल्याने परतूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांनी गाळपेऱ्यात अशी कलिंगड लागवड सुरू केली आहे.

Such determination should be! Due to depletion of water resources, fishing is in danger, fishermen have taken up watermelon farming | अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती

अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती

- शेषराव वायाळ
परतूर :
यंदा निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा न वाढल्याने मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. मासेमारी करणाऱ्या बांधवांनी या कठीण काळातदेखील जिद्द न सोडता टरबूज अर्थात कलिंगड लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यंदा पाणी कमी असल्याने टरबुजास चांगला दर मिळेल अशी त्यांना आशा आहे.

परतूर तालुक्याला निम्न प्रकल्प हा सिंचन पिण्याचे पाणी व मासेमारांसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. तसेच दरवर्षी होणारे मासेमार बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले आहे. धरणात मत्स्यबीज सोडून मासेमार बांधव आपली उपजीविका भागवितात. मात्र मागील वर्षी पाऊस न झाल्याने प्रकल्पात केवळ १८.५९ टक्के जिवंत पाणी साठा राहिला आहे. धरणात पाणी नसल्याने मच्छीमारी व्यवसाय करणे अडचणीचे बनले आहे. धरणात पाणी नसल्याचा परिणाम शेतकऱ्यांसह मच्छीमारावरही होत असल्याने पर्यायी रोजगार शोधण्याची वेळ यावर्षी त्यांच्यावर आली आहे.

कलिंगडाची लागवडही कमीच
धरणात पाणी नसल्याने मासेमारी व्यवसाय ठप्प झालेला आहे. यामुळे पर्यायी रोजगार शोधण्यासाठी कलिंगड लागवडीकडे वळले आहेत.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारी कलिंगडाची लागवड यावर्षी पाणी नसल्याने घटली आहे. मात्र, लागवड घटल्याने दर चांगला मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे.

उपासमारीची वेळ
सध्या धरणात पाणी नसल्याने अहोरात्र पाण्यात फिरूनही मासे सापडत मिळत नाही. यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न आमच्या समोर आहे. शासनाने मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना मदत करावी.
- तुकाराम बलिये, मच्छीमार.

पाणी नसल्याने सोसायटी अडचणीत
मागील दोन वर्षांपासून आमची सोसायटी आर्थिक अडचणीत आली आहे. मागील वर्षी अवकाळी पावसाने टाकलेले कोट्यवधीचे मत्स्यबीज वाहून गेले, तर यावर्षीही लाखो रुपयाचे टाकले आहे, मात्र धरणात पाणी नसल्याने हे बीजही वाया जाणार आहे. शासनाने या मच्छीमार सोसायटीस मदत करून रोजगाराचा प्रश्न सोडवावा.
- निवृती लिंबुरे. मच्छीमार सोयायटी, चेअरमन

Web Title: Such determination should be! Due to depletion of water resources, fishing is in danger, fishermen have taken up watermelon farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.